शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे अच्छे दिन येतील - अण्णा हजारे

By admin | Updated: May 30, 2014 11:42 IST

आता देशात खरोखरच अच्छे दिन येतील असे वाटत असल्याचे सांगत अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ३० - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या एनडीए सरकारचे भरभरुन कौतुक केले आहे. आता देशात खरोखरच अच्छे दिन येतील असे वाटत असल्याचे अण्णा हजारेंनी म्हटले आहे. मोदींचे कौतुक करतानाच अण्णांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केजरीवाल हे भरकटले असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली आहे, 
अण्णा हजारेंनी शुक्रवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखात दिली आहे. यात अण्णांनी मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. 'नवीन सरकारने देशाच्या जनतेसमोर आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यामुळे आता चांगले दिवस येतील असे वाटू लागल्याचे अण्णांनी म्हटले आहे. आमची एक समिती या सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणार असून सहा महिन्यांनंतर मोदींचे सरकार जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यास देशभरात आंदोलन करु असा इशाराही अण्णांनी दिला आहे. काळ्या पैशांसंदर्भात विशेष तपास पथकाची नेमणूक करुन नरेंद्र मोदींनी चांगली सुरुवात केली असून यूपीए सरकार तपास पथक नेमण्यात अपयशी ठरले होते. त्या सरकारमधील मंत्रीच घोटाळ्यांमध्ये असल्याने सरकार तपास पथक नेमण्यास दिरंगाई करत असेल असे टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. मंत्र्यांनी नातवाईकांना खासगी सचिव म्हणून नेमू नये या मोदींच्या आदेशाचेही त्यांनी स्वागत केले. 
मोदींवर टीका करतानाच भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील अण्णांचे साथीदार व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर अण्णांनी जोरदार टीका केली आहे. 'वाराणसीत केजरीवाल मोदींसमोर तग धरु शकणार नाही याचा अंदाज होता. दिल्लीच्या मतदारांनी मुख्यमंत्री बनवल्याने आता मतदार आपल्याला पंतप्रधानही बनवतील असे केजरीवालांना वाटू लागले आहे. केजरीवाल त्यांच्या मार्गावरुन भरकटले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.