शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचं 'आयुष्यमान' वाढवण्यासाठी 'मोदी केअर'पेक्षा मोठी योजना, ५० कोटी जनतेचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 10:22 IST

मोदी सरकारनं 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्यांसाठी मोदी केअरनंतर आता एक मोठी योजना आणणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं सार्वत्रिक सामाजिक सुरक्षितेशी संबंधित असलेल्या कामगार मंत्रालयाच्या अशा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकार 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्यांसाठी मोदी केअरनंतर आता आणखी एक मोठी योजना आणणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं सार्वत्रिक सामाजिक सुरक्षितेशी संबंधित असलेल्या कामगार मंत्रालयाच्या अशा योजनेसंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा कृषी क्षेत्रात काम करणा-या कामगारांनाही फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही मोदींनी ‘ओबामा केअर’च्या धर्तीवर देशातील दहा कोटींहून अधिक गरीब व दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजने(आयुष्यमान भारत)ची घोषणा केली होती.मोदी केअर जगभरातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जात आहे. या नव्या योजनेंतर्गत 10 कोटी गरीब कुटुंबीयांना 5-5 लाखांचं विमा संरक्षण दिलं जाणार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, अर्थ आणि कामगार मंत्रालय या योजनेवर बारकाईनं काम करत आहेत. याअंतर्गत पेन्शन(डेथ व डिसएबिलिटी) आणि मॅटरनिटी संरक्षणाबरोबरच मेडिकल, आजारपण आणि बेरोजगारांनाही संरक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील कनिष्ठ वर्गातील 40 टक्के कामगारांना या योजनेला लाभ पोहोचवण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची गरज आहे. उर्वरित 60 टक्के योजनेसाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागणार आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीच एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मंत्रालयानं कामगार मंत्रालयाला 'सामाजिक संरक्षण सुरक्षा कवच' यावर भर देण्यास सांगितलं आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिका-यांच्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्थ मंत्रालयाचीही सहमती आहे. कामगार मंत्रालयाला वाटतं की, सरकारनं ही योजना हळूहळू सुरू करावी, तसेच सर्वात गरीब कुटुंबाला पहिल्यांदा संरक्षण द्यावं. या योजनेच्या सुरुवातीला कमी पैशांची गरज लागणार आहे. परंतु या योजनेचा विस्तार करण्यासाठी मोठी रक्कम उभारावी लागणार आहे. कशी असेल योजनासार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना ही 10 वर्षांसाठी तीन टप्प्यांत लागू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व कामगारांना संरक्षण दिलं जाणार आहे. ज्यात आरोग्य सुरक्षितता आणि निवृत्तीनंतरच्या फायद्यांचा समावेश असणार आहे. तर दुस-या टप्प्यात बेरोजगारांना फायदा पोहोचवण्यात येणार आहे. तिस-या टप्प्यात दुस-या कल्याणकारी योजना सुरू केल्या जाऊ शकतात. 50 कोटी लाभार्थ्यांना चार स्तरांमध्ये विभागले जाईल. पहिल्या वर्गात दारिद्र्य रेषेखालील लोक असतील. ज्यांना काहीही भरपाई करावी लागणार नाही. याची भरपाई केंद्र सरकार सामान्यांकडून वसूल करण्यात येणा-या करामधून करणार आहे. दुस-या स्तरात अनुदानित योजनांचा समावेश असेल. तर तिस-या टप्प्यात कामगारांचा समावेश असणार आहे. चौथ्या स्तरात संपन्न कामगारांना ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी