शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कोरोनामुळं ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांच्यासाठी मोदी सरकारनं काय केले? केंद्रानं संसदेत सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:21 IST

या योजनेमुळे सामाजिक सुरक्षेसोबतच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. ही स्कीम ईपीएफओच्या माध्यमातून लागू केली.

ठळक मुद्देआतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांची EPFO मध्ये नोंदणी नव्हती अशा कर्मचाऱ्यांनाही भविष्य निधीशी जोडण्यात आलं. पंतप्रधान आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत पुढील २ वर्ष PF बाबत काही चिंता करण्याची गरज नाही. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक वर्षाच्या कालावधीत १० हजार रुपायंहून अधिक कर्ज पुरवठा केला जात आहे.

नवी दिल्ली – सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी संसदेत जोरदार गोंधळ घातला. पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारला कोरोना काळात नोकरी गेलेल्या युवकांवरून प्रश्न विचारला. सरकारने या प्रश्नाचं उत्तर देताना देशातील युवकांची नोकरी का केली याबाबत खुलासा केला.

विरोधकांच्या प्रश्नावर कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, रोजगार आणि बेरोजगारीचे आकडे जमा केले जात आहेत. २०१७-१८ मध्ये ही आकडेवारी समोर आली होती. २०१७-१८ आणि २०१८-१९ च्या आकडेवारीनुसार १५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा बेरोजगारी दर अंदाजानुसार ६ टक्के आणि ५.८ टक्के राहिला आहे. भारतात असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत ज्याने तरूणांना रोजगार उपलब्ध होईल. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा उल्लेख करत १ ऑक्टोबर २०२० रोजी ही योजना आणली असं त्यांनी सांगितले.

या योजनेमुळे सामाजिक सुरक्षेसोबतच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. ही स्कीम ईपीएफओच्या माध्यमातून लागू केली. ज्यामुळे इंप्लॉयर्सवरील बोझा कमी करून त्यांना जास्तीत जास्त कर्मचारी नियुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांची EPFO मध्ये नोंदणी नव्हती अशा कर्मचाऱ्यांनाही भविष्य निधीशी जोडण्यात आलं. या योजनेतंर्गत EPFO सदस्यांसाठी २ वर्षाचा हिस्सा २४ टक्के सरकार देत आहे. सामान्य नोकरी करणाऱ्यांना पीएफ फंडात १२ टक्के भाग द्यावा लागतो. तर १२ टक्के कंपनी देते. परंतु पंतप्रधान आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत पुढील २ वर्ष PF बाबत काही चिंता करण्याची गरज नाही. नोकरी करणारे आणि नोकरी देणारे या दोघांचीही रक्कम सरकार PF अकाऊंटमध्ये टाकत आहे असं कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले.

पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना १ एप्रिल २०१६ रोजी लॉन्च केली होती. या योजनेतंर्गतही सरकारकडून रोजगार प्रदान करण्यात येत आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक वर्षाच्या कालावधीत १० हजार रुपायंहून अधिक कर्ज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कोविडमुळे नोकरी गमावलेल्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभं राहण्याची मदत मिळत आहे असंही कामगार मंत्र्यांनी संसदेत सांगितले.   

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या