शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

रद्दी विकून मोदी सरकारने करोडो कमावले; सरकारी १३ लाख ७३ हजार फायली निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 06:22 IST

महिनाभरात केंद्र सरकारच्या कार्यालायात ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सरकारने प्रलंबित  प्रकरणे आणि सार्वजनिक तक्रारी वेळेत  आणि प्रभावीपणे निकालात काढण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :   केंद्र सरकारने २ ऑक्टोबरला हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेंअंतर्गत केंद्र सरकारच्या  कार्यालयातून तब्बल १३ लाख ७३ हजार २०४ फायलींची विल्हेवाट लावून महिनाभरात केंद्र सरकारच्या कार्यालायात ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. एवढेच नव्हे, रद्दी आणि भंगार विकून ४० कोटी रुपयांची कमाईही केली.

या स्वच्छता मोहिमेच्या फलनिष्पत्तीचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या (डीएपीजी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आढावा घेतला. या मोहिमेच्या फलिनष्पत्तीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, एकूण १५ लाख २३ हजार ४६४ फायलींपैकी १३ लाख ७३ हजार २०४ फायली निकालात काढून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे  एकूण ८ लाख चौरस फूट जागा रिकामी झाली आहे. 

८ लाख चौरस फूट जागा झाली रिकामीn    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सरकारने प्रलंबित  प्रकरणे आणि सार्वजनिक तक्रारी वेळेत  आणि प्रभावीपणे निकालात काढण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. n    सर्व कार्यालयांतील सार्वजनिक तक्रारी, संसद सदस्य, राज्य सरकार, आंतरमंत्रालय सल्ले आणि संसदीय आश्वासनांसंदर्भातील प्रकरणे वेळेत आणि प्रभावीपणे निकाली काढायच्या होत्या.n    जुन्या फायली निश्चित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्या. पंतप्रधान मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियानांने प्रेरित होऊन ही प्रथा पुढेही चालू ठेवणार असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. जेणेकरुन सर्व कार्यालये स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवता येतील.

n    विविध श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी  सरकारने सर्व मंत्रालये, विभागांचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचे आणि स्पर्धात्मक भावनेला चालना देण्यासाठी सामायिक सर्वोत्तम प्रथेचा अवलंब करावा, असे निर्देश डीएपीजीला दिले होते.n    प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, विभागातील जुन्या फायलींची (संचिका) विल्हेवाट लावण्यासाठी ही मोहीम २ ऑक्टोबरपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात आली.

n    जवळपास १३,७३,२०४ फायली निकालात काढण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे ३,२८,२३४ सार्वजनिक तक्रारींपैकी २,९१,६९२ तक्रारी ३० दिवसांत निकाली काढण्यात आल्या. n    खासदारांच्या संदर्भातील ११,०५७ पैकी ८,२८२ तक्रारींचा सोक्षमोक्ष लावण्यात आला. या मोहिमेत जुन्या फायली हटवून केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांत ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार