शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मोदी सरकारने फक्त शोबाजी केली - सोनिया गांधीची टीका

By admin | Updated: August 30, 2015 15:09 IST

मोदी सरकारला सत्तेत येऊन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असून सत्तेवर आल्यापासून या सरकारने फक्त शोबाजीच केली अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - मोदी सरकारला सत्तेत येऊन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असून सत्तेवर आल्यापासून या सरकारने फक्त शोबाजीच केली अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान व नागरिकांचा मृत्यू होत असून पाकसाठी मोदींचे धोरण काय आहे असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाटण्यात महाआघाडीची सभा पार पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जदयूचे नेते नितीशकुमार, राजदचे लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे नेते आदी मान्यवर या सभेत उपस्थित होते. काही जणांना बिहारला कमी लेखण्यात आनंद मिळतो, पण काँग्रेसने नेहमीच बिहारला पाठिंबा दिला आहे असे सांगत सोनिया गांधींनी मोदींना टोला लगावला. केंद्रातील सरकार शेतकरीविरोधी आहे, व्यापम घोटाळ्याने मध्यप्रदेशमधील तरुणांचे भविष्य उध्वस्त केले असे आरोपही त्यांनी भाजपावर आहे. शेतक-यांसाठी आम्ही संसदेत लढलो व त्यामुळेच आता मोदी सरकारला भूसंपादन विधेयकावर झुकावे लागले असे सोनिया गांधींनी म्हटले आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री व जदयू नेते नितीशकुमार यांनीदेखील मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आमचा डीएनए काम करण्याचा असून फक्त बोलणे आमच्या डीएनएत नाही असा चिमटा त्यांनी मोदींना काढला. काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले, पण अजून लोकांच्या बँक खात्यांमध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही. जनधन योजनेंतर्गत १७ कोटी बँक खाती उघडण्यात आली, मात्र त्यापैकी निम्मी खाती निष्क्रीय आहेत असा आरोप नितीशकुमार यांनी केला.