शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

मोदी सरकारने फक्त शोबाजी केली - सोनिया गांधीची टीका

By admin | Updated: August 30, 2015 15:09 IST

मोदी सरकारला सत्तेत येऊन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असून सत्तेवर आल्यापासून या सरकारने फक्त शोबाजीच केली अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - मोदी सरकारला सत्तेत येऊन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असून सत्तेवर आल्यापासून या सरकारने फक्त शोबाजीच केली अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान व नागरिकांचा मृत्यू होत असून पाकसाठी मोदींचे धोरण काय आहे असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाटण्यात महाआघाडीची सभा पार पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जदयूचे नेते नितीशकुमार, राजदचे लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे नेते आदी मान्यवर या सभेत उपस्थित होते. काही जणांना बिहारला कमी लेखण्यात आनंद मिळतो, पण काँग्रेसने नेहमीच बिहारला पाठिंबा दिला आहे असे सांगत सोनिया गांधींनी मोदींना टोला लगावला. केंद्रातील सरकार शेतकरीविरोधी आहे, व्यापम घोटाळ्याने मध्यप्रदेशमधील तरुणांचे भविष्य उध्वस्त केले असे आरोपही त्यांनी भाजपावर आहे. शेतक-यांसाठी आम्ही संसदेत लढलो व त्यामुळेच आता मोदी सरकारला भूसंपादन विधेयकावर झुकावे लागले असे सोनिया गांधींनी म्हटले आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री व जदयू नेते नितीशकुमार यांनीदेखील मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आमचा डीएनए काम करण्याचा असून फक्त बोलणे आमच्या डीएनएत नाही असा चिमटा त्यांनी मोदींना काढला. काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले, पण अजून लोकांच्या बँक खात्यांमध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही. जनधन योजनेंतर्गत १७ कोटी बँक खाती उघडण्यात आली, मात्र त्यापैकी निम्मी खाती निष्क्रीय आहेत असा आरोप नितीशकुमार यांनी केला.