शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

आयएसआयला ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने ३ वर्षात करून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 11:15 IST

भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आली आहे मात्र आयएसआयला जे ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने अवघ्या ३ वर्षात करून दाखवले. हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी हिंदु मुस्लिमांमधे तेढ निर्माण करण्याचा पध्दतशीर प्रयत्न मोदी सरकार, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी चालवला आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी गुजराथच्या निवडणुकीत जो भाजपचा हमखास पराभव करील, अशाच उमेदवाराला व पक्षाला विजयी करा, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाच्या पंचवार्षिक वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य संमेलनात केले. मोठी उपस्थिती असलेल्या संमेलनाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, आशुतोश, गोपाल राय, कुमार विश्वास, आतिशी मर्लेना आदी नेते उपस्थित होते.

‘आप’ संमेलनात मोदी सरकार व भाजपवर तुफान टिकेचे चौफेर वार करीत अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘देशात दोन समुदायांमधे वैर निर्माण करणारे व आयएसआय एजंटांमधे फरक तो काय? देशप्रेमाचा मुखवटा चढवलेले हे लोकच खरे देशद्रोही आहेत. दररोज या देशाला कमजोर करीत आहेत. गुजराथच्या सत्तेतून भाजपला बाहेर केले तर केंद्रीय सत्तेचा पाया खिळखिळा होईल, यासाठी सर्वप्रथम गुजराथमधून भाजपच्या सत्तेचे उच्चाटन केले पाहिजे. उमेदवार कोण, त्याचा पक्ष कोणता, याची फिकीर करण्यापेक्षा भाजपला पराभूत करण्याची क्षमता ज्याच्यात आहे, या एकमेव निकषावर विरोधी उमेदवाराला मतदान करा. गुजराथमधे १८२ जागांपैकी ‘आप’ ने फक्त २0 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. जिथे ‘आप’ उमेदवार मजबूत असेल तिथे त्याला मतदान करा अन्यथा विजयाच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या भाजप विरोधक उमेदवाराच्या पाठिशी सारी शक्ती उभी करा, असे आवाहनही केजरीवालांनी ‘आप’ च्या गुजराथ येथील कार्यक र्त्यांना केले.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपवर हल्ला चढवतांना केजरीवाल म्हणाले, काँग्रेसच्या तुलनेत भाजपचा भ्रष्टाचार किंचितही कमी नाही. राफेल विमान खरेदी घोटाळा, व्यापम घोटाळा, बिर्ला डायरी, सहारा डायरी, अशी भाजपच्या घोटाळयांची कितीतरी उदाहरणे देता येतील. मोदी सरकारच्या राजवटीत न्यायाधिश देखील सुरक्षित नाहीत हे चित्र नुकतेच सामोरे आले आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला ज्या प्रकारे तुम्ही उखडून फेकलेत त्याच पध्दतीने भाजपचे सरकारही आता सत्तेतून पायउतार झाले पाहिजे, अशी वेळ आता येउन ठेपली आहे. दिल्लीत ‘आप’ सरकारचा इतका धसका मोदी सरकारने घेतला आहे की दिल्ली सरकारकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग काढून घेण्यासाठी त्यांनी थेट निमलष्करी दलाचा त्यांनी वापर केला. भारताच्या इतिहासात बहुदा प्रथमच अशी घटना घडली असेल की राज्य सरकारच्या ताब्यातली वास्तू काढून घेण्यासाठी केंद्राने बळाचा वापर केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा