शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

आयएसआयला ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने ३ वर्षात करून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 11:15 IST

भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आली आहे मात्र आयएसआयला जे ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने अवघ्या ३ वर्षात करून दाखवले. हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी हिंदु मुस्लिमांमधे तेढ निर्माण करण्याचा पध्दतशीर प्रयत्न मोदी सरकार, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी चालवला आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी गुजराथच्या निवडणुकीत जो भाजपचा हमखास पराभव करील, अशाच उमेदवाराला व पक्षाला विजयी करा, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाच्या पंचवार्षिक वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य संमेलनात केले. मोठी उपस्थिती असलेल्या संमेलनाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, आशुतोश, गोपाल राय, कुमार विश्वास, आतिशी मर्लेना आदी नेते उपस्थित होते.

‘आप’ संमेलनात मोदी सरकार व भाजपवर तुफान टिकेचे चौफेर वार करीत अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘देशात दोन समुदायांमधे वैर निर्माण करणारे व आयएसआय एजंटांमधे फरक तो काय? देशप्रेमाचा मुखवटा चढवलेले हे लोकच खरे देशद्रोही आहेत. दररोज या देशाला कमजोर करीत आहेत. गुजराथच्या सत्तेतून भाजपला बाहेर केले तर केंद्रीय सत्तेचा पाया खिळखिळा होईल, यासाठी सर्वप्रथम गुजराथमधून भाजपच्या सत्तेचे उच्चाटन केले पाहिजे. उमेदवार कोण, त्याचा पक्ष कोणता, याची फिकीर करण्यापेक्षा भाजपला पराभूत करण्याची क्षमता ज्याच्यात आहे, या एकमेव निकषावर विरोधी उमेदवाराला मतदान करा. गुजराथमधे १८२ जागांपैकी ‘आप’ ने फक्त २0 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. जिथे ‘आप’ उमेदवार मजबूत असेल तिथे त्याला मतदान करा अन्यथा विजयाच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या भाजप विरोधक उमेदवाराच्या पाठिशी सारी शक्ती उभी करा, असे आवाहनही केजरीवालांनी ‘आप’ च्या गुजराथ येथील कार्यक र्त्यांना केले.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपवर हल्ला चढवतांना केजरीवाल म्हणाले, काँग्रेसच्या तुलनेत भाजपचा भ्रष्टाचार किंचितही कमी नाही. राफेल विमान खरेदी घोटाळा, व्यापम घोटाळा, बिर्ला डायरी, सहारा डायरी, अशी भाजपच्या घोटाळयांची कितीतरी उदाहरणे देता येतील. मोदी सरकारच्या राजवटीत न्यायाधिश देखील सुरक्षित नाहीत हे चित्र नुकतेच सामोरे आले आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला ज्या प्रकारे तुम्ही उखडून फेकलेत त्याच पध्दतीने भाजपचे सरकारही आता सत्तेतून पायउतार झाले पाहिजे, अशी वेळ आता येउन ठेपली आहे. दिल्लीत ‘आप’ सरकारचा इतका धसका मोदी सरकारने घेतला आहे की दिल्ली सरकारकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग काढून घेण्यासाठी त्यांनी थेट निमलष्करी दलाचा त्यांनी वापर केला. भारताच्या इतिहासात बहुदा प्रथमच अशी घटना घडली असेल की राज्य सरकारच्या ताब्यातली वास्तू काढून घेण्यासाठी केंद्राने बळाचा वापर केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा