शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
3
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
4
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
5
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
6
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
7
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
8
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
9
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
10
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
11
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
12
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
13
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
14
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
15
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
16
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
17
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
18
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
19
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
20
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
Daily Top 2Weekly Top 5

आयएसआयला ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने ३ वर्षात करून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 11:15 IST

भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आली आहे मात्र आयएसआयला जे ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने अवघ्या ३ वर्षात करून दाखवले. हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी हिंदु मुस्लिमांमधे तेढ निर्माण करण्याचा पध्दतशीर प्रयत्न मोदी सरकार, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी चालवला आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी गुजराथच्या निवडणुकीत जो भाजपचा हमखास पराभव करील, अशाच उमेदवाराला व पक्षाला विजयी करा, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाच्या पंचवार्षिक वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य संमेलनात केले. मोठी उपस्थिती असलेल्या संमेलनाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, आशुतोश, गोपाल राय, कुमार विश्वास, आतिशी मर्लेना आदी नेते उपस्थित होते.

‘आप’ संमेलनात मोदी सरकार व भाजपवर तुफान टिकेचे चौफेर वार करीत अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘देशात दोन समुदायांमधे वैर निर्माण करणारे व आयएसआय एजंटांमधे फरक तो काय? देशप्रेमाचा मुखवटा चढवलेले हे लोकच खरे देशद्रोही आहेत. दररोज या देशाला कमजोर करीत आहेत. गुजराथच्या सत्तेतून भाजपला बाहेर केले तर केंद्रीय सत्तेचा पाया खिळखिळा होईल, यासाठी सर्वप्रथम गुजराथमधून भाजपच्या सत्तेचे उच्चाटन केले पाहिजे. उमेदवार कोण, त्याचा पक्ष कोणता, याची फिकीर करण्यापेक्षा भाजपला पराभूत करण्याची क्षमता ज्याच्यात आहे, या एकमेव निकषावर विरोधी उमेदवाराला मतदान करा. गुजराथमधे १८२ जागांपैकी ‘आप’ ने फक्त २0 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. जिथे ‘आप’ उमेदवार मजबूत असेल तिथे त्याला मतदान करा अन्यथा विजयाच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या भाजप विरोधक उमेदवाराच्या पाठिशी सारी शक्ती उभी करा, असे आवाहनही केजरीवालांनी ‘आप’ च्या गुजराथ येथील कार्यक र्त्यांना केले.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपवर हल्ला चढवतांना केजरीवाल म्हणाले, काँग्रेसच्या तुलनेत भाजपचा भ्रष्टाचार किंचितही कमी नाही. राफेल विमान खरेदी घोटाळा, व्यापम घोटाळा, बिर्ला डायरी, सहारा डायरी, अशी भाजपच्या घोटाळयांची कितीतरी उदाहरणे देता येतील. मोदी सरकारच्या राजवटीत न्यायाधिश देखील सुरक्षित नाहीत हे चित्र नुकतेच सामोरे आले आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला ज्या प्रकारे तुम्ही उखडून फेकलेत त्याच पध्दतीने भाजपचे सरकारही आता सत्तेतून पायउतार झाले पाहिजे, अशी वेळ आता येउन ठेपली आहे. दिल्लीत ‘आप’ सरकारचा इतका धसका मोदी सरकारने घेतला आहे की दिल्ली सरकारकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग काढून घेण्यासाठी त्यांनी थेट निमलष्करी दलाचा त्यांनी वापर केला. भारताच्या इतिहासात बहुदा प्रथमच अशी घटना घडली असेल की राज्य सरकारच्या ताब्यातली वास्तू काढून घेण्यासाठी केंद्राने बळाचा वापर केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा