शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांच्या कर्जमाफीनंतर मोदी सरकारचा आता शेतकऱ्यांच्या पैशांवर डोळा; राहुल गांधींचा घणाघात

By देवेश फडके | Updated: January 18, 2021 12:31 IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची मोदी सरकारवर जोरदार टीकामोदी सरकारचा शेतकऱ्यांच्या पैशावर डोळा असल्याचा दावाट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा घणाघात

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदीसरकारवर जोरदार टीका केली आहे. मित्रांच्या कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांच्या पैशांवर मोदी सरकारचा डोळा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

सुटा-बुटातील आपल्या मित्रांचे ८,७५,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्यानंतर आता मोदी सरकारने अन्नदात्यांचा पैसा बळकवण्यास सुरुवात केली आहे, असा दावा करणारे ट्विट राहुल गांधी यांनी आज (सोमवार) केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकरी बांधवांचा सन्मान करीत नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी यापूर्वी केला होता. 

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत, केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील लढाईत काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे. जोपर्यंत नवीन कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत काँग्रेस मागे हटणार नाही, असे आश्वासन राहुल गांधींकडून देण्यात आले होते. 

तत्पूर्वी, केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधील आणखी एक चर्चेची फेरी निष्फळ ठरली. शेतकऱ्यांनी शेतकरी कायदा रद्द करण्याशिवाय कोणतीही मागणी करावी, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. मात्र, आंदोलक शेतकरी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर, केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांची १९ जानेवारीला चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत तोमर यांनी आश्वस्त केले असून, कृषी कायद्यांबाबत मुद्देसूद चर्चा करावी, असे तोमर यांनी शेतकरी नेत्यांना सांगितले आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपRahul Gandhiराहुल गांधीSocial Mediaसोशल मीडियाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार