शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मोदी सरकारने खोटेपणा केला; इराकमधून जिवंत परतलेल्या हरजितने वाचला अन्यायाचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 10:29 IST

मोसूलमधून अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांमधून जिवंत बचावलेला 27 वर्षीय हरजित मसिह स्वतःच्या विधानावर अद्यापही ठाम आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने 2014मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व 39 भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली होती.

अमृतसर- इराकमधल्या मोसूलमधून अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांमधून जिवंत बचावलेला 27 वर्षीय हरजित मसिह स्वतःच्या विधानावर अद्यापही ठाम आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने 2014मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व 39 भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली होती. मात्र या 40 जणांमधून जिवंत बचावलेला हरजित मसिह यानं दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी केला आहे.सरकारनं भारतीयांचं अपहरण करून त्यांना ठार केल्याच्या वृत्तावर विश्वास का ठेवला नाही, असा सवाल हरजित मसिह यानं विचारला होता. इसिसच्या जाळ्यातून सुखरूप सुटलेले हरजित मसिह म्हणाला, 11 जून 2014ला केंद्र सरकारला भारतीयांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची माहिती दिली होती. इसिसच्या जाळ्यातून सुटलेले मसिह हे एकटेच असल्याचा त्याचा दावा आहे. त्याच्यासमोर 39 भारतीय मजुरांची हत्या करण्यात आली होती. मसिह त्या 40 नागरिकांमधील एक आहे. ज्याचं इराकमधल्या मोसूल शहरात इसिस या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलं होतं. दहशतवाद्यांनी त्यावेळी बांगलादेशी आणि भारतीयांचे दोन वेगवेगळे गट बनवले होते. तसेच बांगलादेशींना जाण्याची परवानगी दिली होती. हे सर्व मजूर मोसूलमध्ये टेक्सटाइल कारखान्यात कामाला होते. सरकारनं मला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि 39 इतरांच्या कुटुंबीयांना खोटी आश्वासनं दिली होती. मी इसिसनं 39 लोकांना मारल्याचं वृत्त सरकारला सांगितलं होतं. परंतु माझ्यावर सरकारनं विश्वास ठेवला नाही. सरकारनं इसिसच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 39 कुटुंबीयांना खोटी आश्वासनं दिली.मसिह सध्या गुरदासपूरमधल्या बाजारात मजूर म्हणून काम करत आहे. मसिहच्या मते, मला सहा महिन्यांपर्यंत जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, पण मी सरकारला सर्व काही खरं सांगितलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारनं माझ्यावर विश्वास ठेवला नाही. जवळपास 6 महिने मी तुरुंगात होतो. याची भरपाई कोण करणार ?, मसिहच्या कुटुंबीयांनी त्याला इराकला पाठवण्यासाठी 1.5 लाख रुपये उधारीवर घेतले होते. हरजित यांच्या मते, इसिसच्या दहशतवाद्यांनी 40 भारतीयांचं अपहरण करत त्यांचा खून केला. परंतु त्यातून मी थोडक्यात बचावलो आणि लागलीच कारखान्यात गेलो. तिथे मला बांगलादेशी मजुरांनी स्वतःचे कपडे दिले. त्यांच्यासोबत मी अली बनून पळालो. त्यावेळी एका बांगलादेशीनं माझा सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क करून दिला आणि मी भारतात परतलो. परंतु सुषमा स्वराज यांनी हरजित मसिह हा खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज