शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

५जी प्रक्रियेतून चीनच्या हुवेईची हकालपट्टी; भारताचा जोरदार दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 06:42 IST

चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारचं कठोर पाऊल

- हरीश गुप्तानवी दिल्ली: भारतात ५जी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेतून चीनच्या हुवेई या दूरसंचार कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. लडाखमधील पूर्व भागात गलवान खोऱ्यामध्ये चिनी लष्कराबरोबर सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारनं हे कठोर पाऊल उचललं आहे.भारतात ५जी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेत अगदी अखेरच्या क्षणी केंद्र सरकारनं हुवेई कंपनीलाही सहभागी करून घेतलं होतं. त्याबद्दल अमेरिकेनं २०१९ मध्ये भारतावर जोरदार टीकाही केली होती. देशातील सुरक्षा तज्ज्ञ व अन्य मंडळींनीही हुवेई कंपनीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ५ जीच्या तंत्रज्ञानाच्या भारतातील चाचण्यांमध्ये हुवेईचाही समावेश झाल्यानं अमेरिकेतील राज्यकर्ते व उद्योगजगत अस्वस्थ झाले होते.गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर केंद्रीय दूरसंचार खात्यानं तातडीनं एक बैठक घेतली. ५ जी तंत्रज्ञान भारतात आणण्यासंदर्भात डिसेंबर २०१९ मध्ये सुरू केलेली प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ५ जी तंत्रज्ञानाच्या कामातून हुवेई कंपनीला याआधी अमेरिका, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर इंग्लंडनं अगदी नाममात्र या कंपनीला सोपवलं आहे. कोरोना साथ रोखण्यासाठी योग्य पावलं न उचलल्याबद्दल चीनविरोधात भारतासह ६३ देशांनी कठोर भूमिका घेतली होती. आता हुवेई कंपनीलाही ५ जी तंत्रज्ञान प्रक्रियेतून भारतानं बाहेर काढल्यानं चीनची आणखी कोंडी झाली आहे. ४ जी सेवेसाठी लागणारी उपकरणं, सुटे भाग पुरवण्यास चिनी कंपन्यांना केंद्रीय दूरसंचार खात्यानं बुधवारी बंदी घातली होती. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या दूरसंचार कंपन्यांनी हुवेई व झेडटीई या चिनी कंपन्यांकडून उपकरणं विकत घेऊ नये असा आदेश केंद्रीय दूरसंचार खातं देणार आहे. त्यानंतर आता ५ जी तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेतूनही चीनची हकालपट्टी करून भारतानं मोठा झटका दिला आहे.

तंत्रज्ञान येण्यास पुन्हा विलंब६० कोटींहून अधिकचे इंटरनेट वापरकर्ते भारतात आहेत. ही इंटरनेट सेवा अधिक जलद करण्यासाठी ५ जी तंत्रज्ञान आणण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. मात्र आता ही प्रक्रिया यंदाच्या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा २०२१ पर्यंत पुढे ढकलली जाणार आहे. हे तंत्रज्ञान भारतात येण्यास आधीच उशीर झाला होता, त्यात आता हा नवीन अडथळा उभा राहिला आहे. 

टॅग्स :huaweiहुआवेchinaचीन