शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिवाळी भेट, रब्बी हंगामासाठी मोदी सरकारने वाढवली MSP, जाणून घ्या किती होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 16:05 IST

Diwali Gift To Farmers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारने काल पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर आज सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. केंद्राच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारने 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

येत्या रब्बी हंगामासाठी सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपये प्रति क्विंटल 2015 वरून 2125 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. चण्याच्या एमएसपीमध्येही 110 रुपयांची वाढ करण्यात आली असून ती 5230 रुपयांवरून 5335 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. सरकारने मसूरच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मसूरची एमएसपी 5500 रुपयांवरून 6000 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. रेपसीड (पांढरी मोहरी) आणि पिवळी मोहरीची एमएसपी प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढवून 5050 रुपयांवरून 5450 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. सैफ फ्लॉवरच्या एमएसपीमध्ये 209 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सैफ फ्लॉवरची एमएसपी 5441 रुपयांवरून 5650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. बार्लीच्या एमएसपीमध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून ती 1635 रुपयांवरून 1735 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.

2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या 1.5 पट एमएसपी देण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच, रेपसीड आणि मोहरीवर 104 टक्के परतावा मिळेल असा सरकारचा दावा आहे. गव्हावर 100 टक्के, मसूरवर 85 टक्के, चण्यावर 66 टक्के, सैफ फ्लॉवरवर 50 टक्के आणि बार्लीवर 60 टक्के परतावा मिळत आहे.

दरम्यान, कृषी तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादन वाढवण्यावर सरकार सातत्याने लक्ष केंद्रित करत असून त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. तेलबियांचे उत्पादन 2014-15 मधील 27.51 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 37.70 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्यात यश आले आहे. डाळींचे उत्पादन वाढवण्यातही यश आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी