शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्यम वर्गाला मोदी सरकार मोठ्ठं गिफ्ट देणार?; अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 17:48 IST

नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली एनडीएनं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. मोदी सरकार 2चा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर होऊ शकतो. या अर्थसंकल्पातून सरकार मध्यमवर्गाला मोठा दिलासा देऊ शकतं. याचा फायदा नोकरदारांना होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. वर्षाकाठी 5 लाखांचं उत्पन्न असलेल्यांना करमाफी देण्याची घोषणा गोयल यांनी केली होती. मात्र कराच्या टप्प्यांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याचा अर्थ 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना करमुक्त करण्यात आलं. मात्र त्यापेक्षा अधिक उत्पन्न असेलल्यांना जुन्याच टप्प्यांनुसार कर भरावा लागेल. मोदींनी सत्ता राखल्यानं करांच्या टप्प्यात बदल होण्याची शक्यता आहे. गोयल यांनी मागील अर्थसंकल्प सादर करताना 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार असल्याची घोषणा केली. हा केवळ ट्रेलर असून पूर्ण अर्थसंकल्पात मध्यम आणि नवमध्यम वर्गाची काळजी घेतली जाईल, असं गोयल यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात मध्यम आणि नवमध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार प्राप्तिकराच्या टप्प्यांमध्ये बदल करू शकतं. याशिवाय प्राप्तिकर गुंतवणूक सवलत सीमा दीड लाखांनी वाढवली जाऊ शकते. प्राप्तिकर कायद्यातही आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फायदा नोकरदारवर्गाला होईल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Budget 2019अर्थसंकल्प 2019Income Taxइन्कम टॅक्स