शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 13:46 IST

आता ही भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल गांधींनी ट्विटबरोबरच त्यांचे व्हिडीओ स्टेटमेंटही प्रसिद्ध केले आहे.

पूर्वेकडील लडाखमध्ये चीनबरोबर LACवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढविला आहे. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदींची ताकदवान नेत्याची तयार केलेली 'खोटी प्रतिमा' ही त्यांची कधी काळी सर्वात मोठी शक्ती होती, परंतु आज ती भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल म्हणाले की, पंतप्रधानांना फक्त त्यांच्या ५६ इंच छातीच्या प्रतिमेची चिंता आहे आणि चीन याचा फायदा घेत आहे. राहुल गांधींनी ट्विट केले की, 'सत्तेसाठी ते एक मजबूत नेता असल्याचा भ्रम मोदींनी पसरविला आहे. ही त्यांची सर्वात मोठी शक्ती होती. आता ही भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल गांधींनी ट्विटबरोबरच त्यांचे व्हिडीओ स्टेटमेंटही प्रसिद्ध केले आहे.'चिनी लोक आमच्या भागात घुसले आहेत, ते व्यूहरचनेशिवाय काहीही करत नाहीत'राहुल गांधी म्हणाले की, चीन जे काही करतो ते त्यांच्या रणनीतीचा भाग असते, जे समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले, 'हा केवळ सर्वसाधारण सीमेवरील वाद नाही. चिनी लोक आमच्या भागात घुसले आहेत ही माझी चिंता आहे. चिनी विचार न करता कोणतीही गोष्ट करत नाहीत. त्यांच्या मनात जगाचा नकाशा तयार आहे आणि ते जगाला स्वत:नुसार आकार देत आहेत. ते जे काय करीत आहेत, ते योजनेनुसारच करत आहेत. ग्वादरदेखील त्याचा एक भाग आहे आणि बेल्ट अँड रोड प्रकल्पसुद्धा त्याचाच हिस्सा आहे. ते जगाची पुनर्रचना करीत आहे. म्हणून जेव्हा आपण चीनचा विचार करता ,तेव्हा आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल. काश्मीरमध्ये पाकिस्तानबरोबर मिळून भारताला अडचणीत आणण्याचा डावकाँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी मोदी सरकारला इशारा दिला की, पाकिस्तानसह मिळून चीन काश्मीरमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न करीत आहे. 'धोरणात्मक पातळीवर ते आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मग ते गलवान असो, डेमचाक असो किंवा पांगांग लेक असो. त्यांना आपली स्थिती मजबूत करायची आहे. ते आमच्या महामार्गामुळे अस्वस्थ आहेत आणि त्यांना आपला महामार्ग नष्ट करायचा आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानबरोबर मिळून काहीतरी केले पाहिजे, असा त्यांचा व्यापक विचार आहेत.चीनचा मोदींवर अतिशय खास मार्गाने दबाव राहुल गांधी म्हणाले की, हा सर्वसाधारण सीमेवरील वाद नाही, परंतु तो अत्यंत विचारपूर्वक तयार केला गेला आहे. हा सर्वसाधारण सीमा वादविवाद नाही. पंतप्रधानांवर दबाव आणण्याचा हा एक भाग असून, ते अतिशय खास मार्गाने दबाव आणत आहेत. ते पंतप्रधानांच्या प्रतिमेवर हल्ला करीत आहेत. त्यांना माहीत आहे की एक प्रभावी राजकारणी म्हणून राहण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या छप्पन इंचाच्या कल्पनेचे संरक्षण केले पाहिजे. ते प्रत्यक्षात नरेंद्र मोदींना सांगत आहेत की, आम्ही जे बोलतोय ते केलं नाही तर आपण नरेंद्र मोदींच्या ताकदवान नेत्याची प्रतिमा खराब करू. ''पंतप्रधानांना त्यांच्या प्रतिमेची चिंता, भारत अडचणीत येईल'पंतप्रधानांनी चीनच्या दबावाखाली आल्याची मला चिंता वाटत असल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'आता प्रश्न पडतो की नरेंद्र मोदी कशी प्रतिक्रिया देतात. ते आव्हान स्वीकारतील की अजिबात नाही म्हणतील? मी भारताचा पंतप्रधान आहे आणि मला माझ्या प्रतिमेची पर्वा नाही. मी तुम्हाला सामोरे जाईन किंवा धडा शिकवेन. मला आतापर्यंत याची काळजी वाटते, पंतप्रधान दडपणाखाली आले आहेत. माझ्या चिंतेची बाब अशी आहे की, चिनी लोकांनी आमच्या भागात प्रवेश केला आहे आणि पंतप्रधान असे उघडपणे सांगत आहेत की तसे काहीही झालेले नाही. हे स्पष्टपणे दर्शविते की त्यांना त्यांच्या प्रतिमेबद्दल चिंता आहे आणि ती जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

हेही वाचा

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी