शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 13:46 IST

आता ही भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल गांधींनी ट्विटबरोबरच त्यांचे व्हिडीओ स्टेटमेंटही प्रसिद्ध केले आहे.

पूर्वेकडील लडाखमध्ये चीनबरोबर LACवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढविला आहे. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदींची ताकदवान नेत्याची तयार केलेली 'खोटी प्रतिमा' ही त्यांची कधी काळी सर्वात मोठी शक्ती होती, परंतु आज ती भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल म्हणाले की, पंतप्रधानांना फक्त त्यांच्या ५६ इंच छातीच्या प्रतिमेची चिंता आहे आणि चीन याचा फायदा घेत आहे. राहुल गांधींनी ट्विट केले की, 'सत्तेसाठी ते एक मजबूत नेता असल्याचा भ्रम मोदींनी पसरविला आहे. ही त्यांची सर्वात मोठी शक्ती होती. आता ही भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल गांधींनी ट्विटबरोबरच त्यांचे व्हिडीओ स्टेटमेंटही प्रसिद्ध केले आहे.'चिनी लोक आमच्या भागात घुसले आहेत, ते व्यूहरचनेशिवाय काहीही करत नाहीत'राहुल गांधी म्हणाले की, चीन जे काही करतो ते त्यांच्या रणनीतीचा भाग असते, जे समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले, 'हा केवळ सर्वसाधारण सीमेवरील वाद नाही. चिनी लोक आमच्या भागात घुसले आहेत ही माझी चिंता आहे. चिनी विचार न करता कोणतीही गोष्ट करत नाहीत. त्यांच्या मनात जगाचा नकाशा तयार आहे आणि ते जगाला स्वत:नुसार आकार देत आहेत. ते जे काय करीत आहेत, ते योजनेनुसारच करत आहेत. ग्वादरदेखील त्याचा एक भाग आहे आणि बेल्ट अँड रोड प्रकल्पसुद्धा त्याचाच हिस्सा आहे. ते जगाची पुनर्रचना करीत आहे. म्हणून जेव्हा आपण चीनचा विचार करता ,तेव्हा आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल. काश्मीरमध्ये पाकिस्तानबरोबर मिळून भारताला अडचणीत आणण्याचा डावकाँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी मोदी सरकारला इशारा दिला की, पाकिस्तानसह मिळून चीन काश्मीरमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न करीत आहे. 'धोरणात्मक पातळीवर ते आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मग ते गलवान असो, डेमचाक असो किंवा पांगांग लेक असो. त्यांना आपली स्थिती मजबूत करायची आहे. ते आमच्या महामार्गामुळे अस्वस्थ आहेत आणि त्यांना आपला महामार्ग नष्ट करायचा आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानबरोबर मिळून काहीतरी केले पाहिजे, असा त्यांचा व्यापक विचार आहेत.चीनचा मोदींवर अतिशय खास मार्गाने दबाव राहुल गांधी म्हणाले की, हा सर्वसाधारण सीमेवरील वाद नाही, परंतु तो अत्यंत विचारपूर्वक तयार केला गेला आहे. हा सर्वसाधारण सीमा वादविवाद नाही. पंतप्रधानांवर दबाव आणण्याचा हा एक भाग असून, ते अतिशय खास मार्गाने दबाव आणत आहेत. ते पंतप्रधानांच्या प्रतिमेवर हल्ला करीत आहेत. त्यांना माहीत आहे की एक प्रभावी राजकारणी म्हणून राहण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या छप्पन इंचाच्या कल्पनेचे संरक्षण केले पाहिजे. ते प्रत्यक्षात नरेंद्र मोदींना सांगत आहेत की, आम्ही जे बोलतोय ते केलं नाही तर आपण नरेंद्र मोदींच्या ताकदवान नेत्याची प्रतिमा खराब करू. ''पंतप्रधानांना त्यांच्या प्रतिमेची चिंता, भारत अडचणीत येईल'पंतप्रधानांनी चीनच्या दबावाखाली आल्याची मला चिंता वाटत असल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'आता प्रश्न पडतो की नरेंद्र मोदी कशी प्रतिक्रिया देतात. ते आव्हान स्वीकारतील की अजिबात नाही म्हणतील? मी भारताचा पंतप्रधान आहे आणि मला माझ्या प्रतिमेची पर्वा नाही. मी तुम्हाला सामोरे जाईन किंवा धडा शिकवेन. मला आतापर्यंत याची काळजी वाटते, पंतप्रधान दडपणाखाली आले आहेत. माझ्या चिंतेची बाब अशी आहे की, चिनी लोकांनी आमच्या भागात प्रवेश केला आहे आणि पंतप्रधान असे उघडपणे सांगत आहेत की तसे काहीही झालेले नाही. हे स्पष्टपणे दर्शविते की त्यांना त्यांच्या प्रतिमेबद्दल चिंता आहे आणि ती जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

हेही वाचा

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी