शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

केसीआर यांच्या हिंदुत्वाला मोदी पराभूत करू शकत नाहीत- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 11:55 IST

हैदराबाद - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखऱ ...

हैदराबाद - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखऱ राव यांचा पराभव करू शकत नाही, कारण तेसुद्धा कट्टर हिंदुत्ववादी आहेत, असं ओवैसी म्हणाले आहेत. एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भाजपा म्हणते तेलंगणामध्ये लवकरच सरकार स्थापन करू, पण के चंद्रशेखऱ राव सुद्धा कट्टर हिंदू आहेत. जर मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर 6 मंदिरात जातील, असंही ओवैसींनी सांगितलं आहे.  केसीआर यांचा पराभव करण्यासाठी भाजपा हिंदुत्वाचं कार्ड वापरू शकत नाही. आम्ही हिंदू धर्माच्या विरोधात नाही. परंतु हिंदुत्वाच्या विरोधात आहोत. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वींवरही निशाणा साधला आहे. नक्वींनी दरवर्षी एक कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं आश्वासन दिलं होतं. मग केंद्रीय बजेटमध्ये शिष्यवृत्ती काही दिली नाही?, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.ओवैसींनी संघालाही लक्ष्य केलं आहे. इथे कथित स्वरूपात 'जय श्री राम' आणि 'वंदे मातरम' न म्हटल्यास मुस्लिमांना मारहाण केली जाते. लोकांना मारहाण केली जाते, कारण ते जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा देत नाहीत. अशा घटना आता थांबणार नाहीत. फक्त मुसलमान आणि दलितांना टार्गेट केलं जातंय. अशा घटनांच्या मागे एक गट आहे आणि तो संघ परिवाराशी निगडित आहे.राजस्थानमध्ये दोन वर्षांपूर्वी मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालेल्या पहलू खानविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. या प्रकरणावरून ओवैसी यांनी काँग्रेसलाही खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेस नेहमीच दुटप्पी भूमिका घेत असते. जेव्हा पहलू खानवर हल्ला झाला, त्यावेळी काँग्रेसनं त्याचा निषेध नोंदवला होता. अशोक गेहलोत सरकारचं हे निधेषार्ह कार्य आहे. राजस्थानच्या मुस्लिमांना काँग्रेसनं नेहमीच दगा दिला आहे. त्यामुळे मुस्लिमांनी काँग्रेसवर विश्वास ठेवू नये. 

k-chandrashekar-rao-is-a-staunch-hindu-bjp-can-not-defeat-kcr-says-asaduddin-owaisi/

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीHindutvaहिंदुत्व