शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"मोदी बाबू, बंगाल जळाला तर दिल्लीच्या खुर्चीला हादरे बसतील", ममता बॅनर्जींचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:05 IST

Mamata Banerjee Warns Narendra Modi: काल भाजपाने पुकारलेल्या बंगाल बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून, विरोधकांकडून ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच या घटनेविरोधात काल भाजपाने पुकारलेल्या बंगाल बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपाने पुकारलेल्या भारत बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीवरून ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, काही लोकांना वाटतंय की हा बांगलादेश आहे. मला बांगलादेश आवडतो, तिथले लोक आमच्यासारखंच बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. मात्र बांगलादेश हा वेगळा देश आहे आणि भारत हा वेगळा देश आहे, हे लक्षात ठेवा.  मोदी बाबू तुम्ही तुमच्या पक्षाला सांगून आग लावत आहात. लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर आसाम गप्प बसणार नाही. पूर्वोत्तरेतील राज्यही शांत राहणार नाहीत. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि ओदिशाही शांत राहणार नाही. दिल्लीसुद्धा शांत राहणार नाही. तुमची खुर्ची हलवून टाकू, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनी आयोजित एका सभेमध्ये केलं. ममता बॅनर्जींच्या विधानानंतर बंगालमधील वातावरण तापलं आहे. तसेच भाजपाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

बदला नाही तर बदलाची आपली जुनी घोषणा विसरून ममता बॅनर्जी ह्या विरोधी पक्षांना धमकावण्याचं काम करत आहेत, असा आरोप भाजपाने केला. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सुकांत मुजुमदार यांनी ममता बॅनर्जी यांनी केलेलं विधान धमकीपूर्ण असल्याची टीका करत त्याचा निषेध केला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून ममता बॅनर्जी ह्या महत्त्वाच्या पदावर राहण्यासाठी पात्र राहिल्या नसल्याचे सांगितले. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विधानावर ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही टीका केली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा