शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा होऊ नये, मोदी आणि जिनपिंग यांचं एकमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 14:13 IST

जवळपास एक तास चाललेल्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यावर सहमती दर्शवली आहे

नवी दिल्ली, दि. 5 - ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली. जवळपास एक तास चाललेल्या या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यावर सहमती दर्शवली आहे. 'सुरक्षा जवानांनी चांगला संपर्क ठेवत काही दिवसांपुर्वी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे', असं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. 

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एस जयशंकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी वारंवार दोन्ही नेत्यांनी चर्चेत पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यावर भर दिला असल्याचं सांगितलं. एस जयशंकर हे डोकलाम वादाच्या पार्श्वभुमीवर बोलत होते हे नक्की होतं. मात्र त्यांनी एकदाही डोकलामचा उल्लेख केला नाही. 

दोन्ही देशांनी सीमारेषेवर शांतता राहावी यावर एकमत दर्शवलं आहे. आपापसातील नातं दृढ व्हावं यासाठी दोन्ही देशांनी अजून प्रयत्न करत पुढे वाटचाल करणं गरजेचं असल्याचंही दोन्ही देशांनी सांगितलं आहे. डोकलामसंबंधी प्रश्न विचारला असता एस जयशंकर यांनी भुतकाळात जे झालं त्यावर चर्चा करण्यापेक्षा भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यावर भर दिल्याचं सांगितलं. 

'काय झालं हे दोन्ही देशांना माहित आहे. हे काय झालं यावर चर्चा नव्हती, पण काय होईल यासाठी होती', असं एस जयशंकर बोलले आहेत. महत्वाचं म्हणजे या चर्चात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर चर्चा झाली नाही. मात्र घोषणापत्रात दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. 'दहशतवादामुळे समोर उभी राहिलेल्या आव्हानांबद्दल सर्व देशांचं एकमत आहे. फक्त भारतालाच वाटतं असं नाही. अनेक देशांचं दहशतवादावर हेच मत आहे. घोषणापत्रातून सर्वांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे', असं एस जयशंकर यांनी सांगितलं. 

याआधी ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सबका साथ सबका विकास'चा नारा दिला. मंगळवारी 'डायलॉग ऑफ इमर्जिंग मार्केट्स अँण्ड डेव्हलपिंग कंट्रीज' कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा नारा दिला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाच्या आर्थिक विकासासाठी सबका साथ, सबका विकास गरजेचं असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दहशतवाद, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात पुढे येत असलेल्या देशांमध्ये सहकार्य महत्वाचं असल्याचं सांगितलं. पुढील दशक आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. पुढील दशक सुवर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनDoklamडोकलाम