शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

लष्कराचे आधुनिकीकरण योग्य दिशेने सुरू; अपुऱ्या निधीचं वृत्त तथ्यहीन -लष्करप्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 09:47 IST

वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जनरल नरवणे यांनी म्हटले आहे की, लष्कराचे आधुनिकीकरण योग्य पद्धतीने, दिशेने सुरूच आहे व यासाठी संसाधन सरकार पुरवीत आहे.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण योग्य दिशेने सुरू आहे, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली. पूर्व लडाखमध्ये चीनसमवेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) अधिक संसाधन खर्च करण्याची गरज असून, यातून नवी शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी पैशाची चणचण आहे, अशी चर्चा त्यांनी फेटाळून लावली. मागील वित्त वर्षात आतापर्यंत २१ हजार कोटी रुपयांच्या कंत्राटांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच ढांचागत विकासासाठी अन्य खरेदी प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहेत.वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जनरल नरवणे यांनी म्हटले आहे की, लष्कराचे आधुनिकीकरण योग्य पद्धतीने, दिशेने सुरूच आहे व यासाठी संसाधन सरकार पुरवीत आहे. काही दिवसांपूर्वीच १६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कंत्राट पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर पाच हजार कोटी रुपयांचे ४४ कंत्राटे वित्त वर्ष २०२०-२१मध्ये आपात खरेदी योजनेसाठी पूर्ण केले आहेत. लष्कराच्या आधुनिकीकरणात कसल्याही अडचणी नाहीत.सरकारने फेब्रुवारी २०२१-२२साठीच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी ४.७८ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यातील १.३५,०६० कोटी रुपयांची तरतूद पूंजीगत व्ययसाठी वेगळी करण्यात आली होती. यात नवी शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने, युद्धजहाज व अन्य लष्करी साहित्याची खरेदी समाविष्ट आहे. अर्थसंकल्पानुसार वित्तवर्ष २०२१-२२ साठी संरक्षण क्षेत्राच्या पूंजीगत व्ययमध्ये मागील वर्षीच्या १,३१,७३४ कोटी रुपयांच्या तुलनेत १८.७५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.चीनच्या वाढत्या आक्रमकतेला प्रभावी पद्धतीने तोंड देण्यासाठी संरक्षण तज्ज्ञ मागील काही वर्षांपासून भारतीय लष्कराचे वेगाने आधुनिकीकरण करण्यावर भर देत आहे. पूर्व लडाखमध्ये मागील वर्षी मे महिन्यात ४५ वर्षांत प्रथमच भारतीय सेना व चिनी सेनेमध्ये हिंसाचार होऊन तणाव वाढलेला आहे. पेंगाँग सरोवराजवळ सैनिकांच्या वापसीच्या मुद्द्यावर मर्यादित प्रगती झाली आहे, तर उर्वरित ठिकाणी असाच प्रकारची पावले उचलण्यासाठीच्या चर्चेत अडथळे आले आहेत.जनरल नरवणे यांनी सांगितले की, सध्या भारतीय लष्कर उंचीवरील ठिकाणांच्या सर्व महत्त्वाच्या स्थानी पकड ठेवून आहे. तेथे कोणत्याही आपात स्थितीशी निपटण्यासाठी पुरेशा संख्येने आरक्षित जवान अस्तित्वात आहेत.राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या पूर्व लडाखमध्ये एलएसीच्या संवेदनशील भागांत सध्या ५० हजार ते ६० हजार सैनिक तैनात आहेत.भारत व चीनच्या संबंधांत गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर तणाव वाढला आहे.दोन्ही देशांनी या भागात हजारोंच्या संख्येने सैनिक व रणगाडे, शस्त्रास्त्रे तैनात केलेली आहेत.तणाव कमी करण्यासाठी नऊ महिन्यांनंतर सैन्य व राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.त्यानंतर दोन्ही देशांच्या सेना पेंगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून मागे हटली आहेत. सैन्य वापसीसाठी दोन्ही बाजूंच्या चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या आहेत. तरीही इतर ठिकाणांबाबत तणाव कायम आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानmanoj naravaneमनोज नरवणे