शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

वाहनधारकांकडून मोबाईल बंदीचे उल्लंघन

By admin | Updated: May 6, 2014 16:26 IST

मूर्तिजापूर : अपघातांना आळा बसावा यासाठी चालू वाहनावर मोबाईल वापरण्यावर बंदी असली तरी या नियमाचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मूर्तिजापूर शहर व ग्रामीण भागात हेच चित्र आहे. मोबाईलमुळे अनेकांनी आपला प्राण गमावला आहे. चौकाचौकात दुचाकीस्वार सर्रास मोबाईलचा वापर करताना दिसत आहे. मोबाईलचा वापर करताना कायद्याची पायमल्ली होत असली तरी कोणीही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही.

मूर्तिजापूर : अपघातांना आळा बसावा यासाठी चालू वाहनावर मोबाईल वापरण्यावर बंदी असली तरी या नियमाचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मूर्तिजापूर शहर व ग्रामीण भागात हेच चित्र आहे. मोबाईलमुळे अनेकांनी आपला प्राण गमावला आहे. चौकाचौकात दुचाकीस्वार सर्रास मोबाईलचा वापर करताना दिसत आहे. मोबाईलचा वापर करताना कायद्याची पायमल्ली होत असली तरी कोणीही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही.
प्रत्येक जण मोबाईल बाळगतो. वाहन चालवितानाही मोबाईलचा वापर केला जातो. एका हातात स्टेअरिंग आणि दुसर्‍या हातात मोबाईल, असा प्रकार सुरू असतो. अवैध प्रवासी वाहतूक करणारे तर हमखास मोबाईल कानाला लावून वाहन चालविताना दिसून येतात. आधीच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात बसविले जातात. त्यामुळे चालकाला धड वाहनही चालविता येत नाही. त्यातच मोबाईलची रिंग वाजली, की चालक एका हाताने खिशातून मोबाईल काढून त्यावर बोलतो. कुणी हटकण्याचा प्रयत्न केला तर प्रवाशांवरच आरडाओरडा केली जातो. अनेक चालक तर वाहन चालविताना कानात इअरफोन लावून गाणे ऐकत असतात. एसटी बसेसमध्ये चालकांना मोबाईल वापरण्यावर बंदी आहे; परंतु या नियमाचे चालक अजिबात पालन करीत नाहीत. मागाहून येणार्‍या वाहनाने कितीही हॉर्न वाजविला तरी ऐकू येत नाही. मोबाईलचा होणारा असा वापर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे पोलिस विभागाच्या वतीने सांगितले जाते. कायद्यातही तशी तरतूद करण्यात आली आहे; मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. (प्रतिनिधी)