शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Mob Lynching : लोकांनी बीफ खाणं बंद करावं, मॉब लिंचिंगला आळा बसेल, RSS नेत्याचा अजब तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 13:11 IST

मॉब लिचिंगसारख्या गंभीर समस्येवर आरएसएस नेत्यानं अजब तोडगा शोधून काढला आहे. 

रांची - अफवा तसंच संशयातून मॉब लिचिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीही गो-तस्करीच्या संशयावरुन राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात जमावानं केलेल्या मारहाणीत 28 वर्षीय अकबर खानचा मृत्यू झाला होता. या गंभीर समस्येवर आरएसएस नेता इंद्रेश कुमार यांनी अजब तोडगा शोधून काढला आहे. लोकांनी बीफ खाणं बंद करावं, म्हणजे मॉब लिचिंगसारख्या गुन्ह्यांवर आळा बसेल, असा अजब तोडगा इंद्रेश कुमार यांनी सुचवला आहे. 

('मुस्लिमांच्या तुलनेत गाय सर्वाधिक सुरक्षित', शशी थरुर यांचं वादग्रस्त ट्विट)

आपण सर्व जण संकल्प करुन मानवतेला गोहत्यतेच्या पापातून का मुक्त करत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. झारखंडमधील रांची येथील हिंदू जागरण मंचाच्या कार्यालयाचे संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी सोमवारी उद्घाटन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  शिवाय, जनतेवरही योग्य  संस्कार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणालेत. पुढे इंद्रेश कुमार असंही म्हणाले की,  जर गोमांस खाणे बंद केले तर या घटनाही थांबू शकतात. कोणत्याही धर्मात गायींची कत्तल करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ख्रिश्चनांमध्येही गायीला मातेचा दर्जा असून इस्लाम धर्मातील सर्वोच्च ठिकाण असलेल्या मक्का- मदीना येथेही गोहत्या हा गुन्हा मानला जातो. 

नेमकी काय आहे घटना?

मूळ हरियाणा जिल्ह्याचा रहिवासी, पण राजस्थानात गोपालन व दूध व्यवसाय करणाऱ्या अकबर खानला रामगड गावी ठार करण्यात आले. तो हत्येसाठी गाय नेत असावा, असा संशय गोरक्षकांना आला आणि जमावानं त्याला ठार केले. त्याच्याबरोबर एक मित्रही होता. दोन जणांनी अन्य गावकऱ्यांना बोलावून त्यांना मारहाण केली. विचारपूस करण्याआधीच जमावानं त्याला व त्याच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अकबर खान मरण पावला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणातील कोलगाव येथून त्यानं गायी आणल्या होत्या आणि त्या घरी नेत होता, अशी माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी अकबरच्या वडिलांनी केली आहे. 

 

टॅग्स :LynchingलीचिंगRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ