शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:44 IST

आता रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात एमजे अकबर यांना जागा देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय नेते एमजे अकबर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये परतले आहेत. केंद्र सरकारने दहशतवादावर पाकिस्तानचा चेहरा उघड करण्यासाठी भारताकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवण्याचं ठरवले आहे. त्यात एमजे अकबर यांचाही समावेश आहे. ७ वर्षापूर्वी २०१८ साली एका वादानंतर एमजे अकबर यांना परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्रिपद सोडावे लागले होते. 

आता रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात एमजे अकबर यांना जागा देण्यात आली आहे. हे शिष्टमंडळ यूनाइटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहे. एमजे अकबर यांची कूटनिती या मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल. एमजे अकबर यांनी दहशतवादापासून पाकिस्तानविरोधात कायम भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना लोक जे विचार करत नाहीत, ते मोदी शक्य करून दाखवतात असं त्यांनी म्हटलं आहे.

मीटू वादात अडकले होते अकबर

२०१८ साली मी टू वादात एमजे अकबर यांना जोरदार फटका बसला. अनेक माजी महिला सहकाऱ्यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे एमजे अकबर यांना केंद्रीय मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अकबर यांनी त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत पत्रकार प्रिया रमानीविरोधात मानहानीचा दावा केला होता. २०२१ साली दिल्लीतील एका कोर्टाने रमानीला निर्दोष करत सोडून दिले. त्याविरोधात अकबर दिल्ली हायकोर्टात गेले. या वादामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे राजकीय प्रवासात त्यांना मागे राहावे लागले.

कोण आहेत एमजे अकबर?

एमजे अकबर यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. पत्रकारितेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर बिहारच्या किशनगंज येथे निवडणूक लढवली. २ वर्षांनी १९९१ साली पुन्हा लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ साली ते भाजपात सहभागी झाले. १ वर्ष पक्षाचे प्रवक्ते पद सांभाळल्यानंतर २०१५ साली एमजे अकबर यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यानंतर सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री बनवण्यात आले. २०१८ साली मी टू आंदोलनात एमजे अकबर यांच्यावरही आरोप झाले आणि त्यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीM J Akbarएम. जे. अकबर