शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मिझोराम : आपणच भाजपाविरोधी दाखविण्याचे जोरात प्रयत्न; सत्ताधारी व विरोधक दोघांत चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 05:37 IST

ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या मोहिमेत हे राज्य ठरू शकते मोदींसाठी अडथळा

ऐझॉल : केवळ १० लाख लोकवस्ती असलेल्या मिझोराम या पर्वतीय राज्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी २८ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) यांच्यामध्ये सर्वात कडवा भाजपाविरोधक कोण हे दाखविण्याची चुरस लागली आहे. मात्र गमतीचा भाग असा की या दोन्ही पक्षांनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भाजपाशी याआधी हातमिळवणी केली होती.ख्रिश्चनबहुल मिझोराममध्ये ३0 वर्षांत भाजपला विधानसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही तरीही केंद्रात सत्ताधारी पक्षाला या निवडणुकांत महत्त्व आले आहे. काँग्रेस व एमएनफने राज्यात आजवर आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे. भाजपाचा घटक पक्ष असल्याचे आरोप हे पक्ष एकमेकांवर करत आहेत. त्यासाठी भाजपाशी पूर्वी हातमिळवणी केल्याची जुनी छायाचित्रे, सभांतील भाषणे यांचे संदर्भ मतदारांसमोर आणली जात आहे.

एमएनएफ हा एनडीएचा घटक पक्ष होता. या पक्षाने भाजपाशी छुपी हातमिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून तो दावा सिद्ध करण्यासाठी ५० हजार पत्रके छापून ती मतदारांना वाटली आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा व एमएनएफचे नेते झोरामथंगा यांचे एकत्रित छायाचित्रही त्या पत्रकावर आहे, तर चकमा स्वायत्त जिल्हा कौन्सिलच्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस व भाजपाने हातमिळवणी केल्याचा आरोप एमएनएफने केला. आता ही युती राहिलेली नाही, असे काँग्रेसने जाहीर केले आहे. भाजपाला ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्यात मिझोरम हा मोठा अडथळा आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे, तर नागालँड, मेघालयमध्ये भाजपाने आघाडी सरकार स्थापन केले आहे.

मिझोरम राज्यातील ११६४ मतदान केंद्रापैकी ३८ केंद्रे अतिसंवेदनशील तर ३० केंद्रे संवेदनशील आहेत. या भागांत केंद्रीय सुरक्षा दलाच्या ४० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात २८ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणूक अधिकाºयाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निष्पक्ष आणि शांततेत निवडणूक घेणे हे आयोगासमोर दिव्य आहे. ब्रू समाजाचा मुद्दा निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला असून तो जास्त स्फोट बनू नये यासाठी प्रशासन सक्रीय आहे.७६ टक्के बंदुका जमाविधानसभा निवडणुकांमुळे ७६ टक्के म्हणजे १० हजार ३३७ परवानाधारकांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. पोलीस महासंचालक एल. एच. शानलिआना म्हणाले की, या शस्त्रधारकांमध्ये शेतकरीही मोठ्या प्रमाणावर आहेत. पिकांचे प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी त्यांना शस्त्र परवाने दिले जातात. मिझोरम निवडणुकांत आसाम, त्रिपुरा, मणिपूरमधील लोकांनी येऊन गडबड करू नये म्हणूनही पोलीस दक्षता घेत आहेत. 

टॅग्स :Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाElectionनिवडणूक