शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मिझोराम : आपणच भाजपाविरोधी दाखविण्याचे जोरात प्रयत्न; सत्ताधारी व विरोधक दोघांत चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 05:37 IST

ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या मोहिमेत हे राज्य ठरू शकते मोदींसाठी अडथळा

ऐझॉल : केवळ १० लाख लोकवस्ती असलेल्या मिझोराम या पर्वतीय राज्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी २८ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) यांच्यामध्ये सर्वात कडवा भाजपाविरोधक कोण हे दाखविण्याची चुरस लागली आहे. मात्र गमतीचा भाग असा की या दोन्ही पक्षांनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भाजपाशी याआधी हातमिळवणी केली होती.ख्रिश्चनबहुल मिझोराममध्ये ३0 वर्षांत भाजपला विधानसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही तरीही केंद्रात सत्ताधारी पक्षाला या निवडणुकांत महत्त्व आले आहे. काँग्रेस व एमएनफने राज्यात आजवर आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे. भाजपाचा घटक पक्ष असल्याचे आरोप हे पक्ष एकमेकांवर करत आहेत. त्यासाठी भाजपाशी पूर्वी हातमिळवणी केल्याची जुनी छायाचित्रे, सभांतील भाषणे यांचे संदर्भ मतदारांसमोर आणली जात आहे.

एमएनएफ हा एनडीएचा घटक पक्ष होता. या पक्षाने भाजपाशी छुपी हातमिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून तो दावा सिद्ध करण्यासाठी ५० हजार पत्रके छापून ती मतदारांना वाटली आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा व एमएनएफचे नेते झोरामथंगा यांचे एकत्रित छायाचित्रही त्या पत्रकावर आहे, तर चकमा स्वायत्त जिल्हा कौन्सिलच्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस व भाजपाने हातमिळवणी केल्याचा आरोप एमएनएफने केला. आता ही युती राहिलेली नाही, असे काँग्रेसने जाहीर केले आहे. भाजपाला ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्यात मिझोरम हा मोठा अडथळा आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे, तर नागालँड, मेघालयमध्ये भाजपाने आघाडी सरकार स्थापन केले आहे.

मिझोरम राज्यातील ११६४ मतदान केंद्रापैकी ३८ केंद्रे अतिसंवेदनशील तर ३० केंद्रे संवेदनशील आहेत. या भागांत केंद्रीय सुरक्षा दलाच्या ४० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात २८ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणूक अधिकाºयाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निष्पक्ष आणि शांततेत निवडणूक घेणे हे आयोगासमोर दिव्य आहे. ब्रू समाजाचा मुद्दा निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला असून तो जास्त स्फोट बनू नये यासाठी प्रशासन सक्रीय आहे.७६ टक्के बंदुका जमाविधानसभा निवडणुकांमुळे ७६ टक्के म्हणजे १० हजार ३३७ परवानाधारकांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. पोलीस महासंचालक एल. एच. शानलिआना म्हणाले की, या शस्त्रधारकांमध्ये शेतकरीही मोठ्या प्रमाणावर आहेत. पिकांचे प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी त्यांना शस्त्र परवाने दिले जातात. मिझोरम निवडणुकांत आसाम, त्रिपुरा, मणिपूरमधील लोकांनी येऊन गडबड करू नये म्हणूनही पोलीस दक्षता घेत आहेत. 

टॅग्स :Mizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाElectionनिवडणूक