शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

५० लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त; १५ ऑगस्टच्या दिवशी 'या' राज्य सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 16:49 IST

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने राज्य सरकारने ५० लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्याची घोषणा केली आहे. 

नवी दिल्ली - आज देशभरात ७८ वा स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. त्यातच मिझोराम सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकांची आर्थिक प्रगती व्हावी यादृष्टीने ५० लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्याची योजना सुरू केली आहे. स्वातंत्र्यता दिवशी मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी याची घोषणा केली आहे.

स्वातंत्र्य दिन सोहळ्यात भाषण करताना मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले की, आमचं सरकार सर्वसमावेशक असून राज्याची प्रगती, सरकारी योजनांचा जास्तीत जास्त जबाबदारी आणि पारदर्शकपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहे. मागील डिसेंबर २०२३ रोजी सत्तेत आल्यानंतर जोरम पीपुल्स मूवमेंट सरकारने अनेक बदलांवर पाऊल पुढे टाकलं आहे असं त्यांनी सांगितले.

त्यासोबत राज्यातील सरकार विकासासाठी प्रयत्नशील आहे. त्यातूनच आम्ही एक मोठा निर्णय घेत ही योजना लागू करत आहोत ज्यातून आर्थिक विकासाच्या दृष्टीने पात्र लोकांना मदत करण्यासाठी गॅरंटी म्हणून सरकार काम करेल. मिझोराम सरकार गॅरंटी अधिनियम २०११ मध्ये दुरुस्ती करत त्यातील पात्र लोकांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल आणि सरकार त्यावर गॅरंटीसह व्याजही भरेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

दरम्यान, युनिव्हर्सल हेल्थ केअर स्कीम नावाने नवीन आरोग्य सेवा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही सर्वसमावेशक योजना सर्वसामान्य जनता, सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना समाविष्ट करेल. मिझोरामची वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने वित्तीय स्थिरीकरण आणि वित्तीय एकत्रीकरणाला प्राधान्य दिले आहे. 

सर्वसामान्यांना मोठा दिलासा

मिझोराम सरकारने १५ ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या या योजनेंतर्गत लोकांना एक किंवा दोन नव्हे तर ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्यावर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही अशा परिस्थितीत जर लोकांनी घर किंवा इतर गोष्टींसाठी बँकेकडून कर्ज घेतले तर त्यांना फक्त कर्जाची रक्कम परत करावी लागेल साधारणपणे, बँकेकडून एवढं मोठं कर्ज घेतल्यावर कर्ज देणाऱ्याला जवळपास दुप्पट रक्कम द्यावी लागते. त्यामुळे मिझोरम सरकारच्या या योजनेमुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :mizoram assembly electionमिझोराम विधानसभा निवडणूक २०२३