शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

५० लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त; १५ ऑगस्टच्या दिवशी 'या' राज्य सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 16:49 IST

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने राज्य सरकारने ५० लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्याची घोषणा केली आहे. 

नवी दिल्ली - आज देशभरात ७८ वा स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. त्यातच मिझोराम सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकांची आर्थिक प्रगती व्हावी यादृष्टीने ५० लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्याची योजना सुरू केली आहे. स्वातंत्र्यता दिवशी मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी याची घोषणा केली आहे.

स्वातंत्र्य दिन सोहळ्यात भाषण करताना मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले की, आमचं सरकार सर्वसमावेशक असून राज्याची प्रगती, सरकारी योजनांचा जास्तीत जास्त जबाबदारी आणि पारदर्शकपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहे. मागील डिसेंबर २०२३ रोजी सत्तेत आल्यानंतर जोरम पीपुल्स मूवमेंट सरकारने अनेक बदलांवर पाऊल पुढे टाकलं आहे असं त्यांनी सांगितले.

त्यासोबत राज्यातील सरकार विकासासाठी प्रयत्नशील आहे. त्यातूनच आम्ही एक मोठा निर्णय घेत ही योजना लागू करत आहोत ज्यातून आर्थिक विकासाच्या दृष्टीने पात्र लोकांना मदत करण्यासाठी गॅरंटी म्हणून सरकार काम करेल. मिझोराम सरकार गॅरंटी अधिनियम २०११ मध्ये दुरुस्ती करत त्यातील पात्र लोकांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल आणि सरकार त्यावर गॅरंटीसह व्याजही भरेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

दरम्यान, युनिव्हर्सल हेल्थ केअर स्कीम नावाने नवीन आरोग्य सेवा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही सर्वसमावेशक योजना सर्वसामान्य जनता, सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना समाविष्ट करेल. मिझोरामची वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने वित्तीय स्थिरीकरण आणि वित्तीय एकत्रीकरणाला प्राधान्य दिले आहे. 

सर्वसामान्यांना मोठा दिलासा

मिझोराम सरकारने १५ ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या या योजनेंतर्गत लोकांना एक किंवा दोन नव्हे तर ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्यावर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही अशा परिस्थितीत जर लोकांनी घर किंवा इतर गोष्टींसाठी बँकेकडून कर्ज घेतले तर त्यांना फक्त कर्जाची रक्कम परत करावी लागेल साधारणपणे, बँकेकडून एवढं मोठं कर्ज घेतल्यावर कर्ज देणाऱ्याला जवळपास दुप्पट रक्कम द्यावी लागते. त्यामुळे मिझोरम सरकारच्या या योजनेमुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :mizoram assembly electionमिझोराम विधानसभा निवडणूक २०२३