शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:22 IST

गुलाम नबी आझाद : विरोधकांच्या आघाडीत खोडा घालण्याचा प्रकार

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी साकारू नये यासाठी त्या पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्याकरिता मोदी सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. बेकायदा खाणकामप्रकरणी समाजवादी पार्टीचे (सपा) नेते अखिलेश यादव यांची सीबीआय करणार असलेली चौकशी म्हणजे भाजपचे सुडाचे राजकारण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सरकार सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर खाते या यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. अखिलेश यादव यांच्या विरोधात सीबीआय करीत असलेल्या चौकशीचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रकारचे राजकारण व हुकूमशाही देशात चालू देणार नाही. गेल्या साडेचार वर्षांत त्यांची चौकशी करण्याची बुद्धी सरकारला झाली नाही.आता लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर अचानक बेकायदा खाणकाम प्रकरणाची आठवण झाली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विरोधातही अनेक पक्ष एकवटले होते; मात्र त्यांनी मोदी सरकारप्रमाणे विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर केला नव्हता, असे ते म्हणाले.हुकूमशाही राजवट संपवा- केजरीवालच्अखिलेश यादव यांच्या मागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या मोदी सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीका केली आहे. ही हुकूमशाही प्रवृत्तीची व लोकशाहीविरोधी राजवट संपुष्टात आणा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक