शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:22 IST

गुलाम नबी आझाद : विरोधकांच्या आघाडीत खोडा घालण्याचा प्रकार

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी साकारू नये यासाठी त्या पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्याकरिता मोदी सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. बेकायदा खाणकामप्रकरणी समाजवादी पार्टीचे (सपा) नेते अखिलेश यादव यांची सीबीआय करणार असलेली चौकशी म्हणजे भाजपचे सुडाचे राजकारण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सरकार सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर खाते या यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. अखिलेश यादव यांच्या विरोधात सीबीआय करीत असलेल्या चौकशीचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रकारचे राजकारण व हुकूमशाही देशात चालू देणार नाही. गेल्या साडेचार वर्षांत त्यांची चौकशी करण्याची बुद्धी सरकारला झाली नाही.आता लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर अचानक बेकायदा खाणकाम प्रकरणाची आठवण झाली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विरोधातही अनेक पक्ष एकवटले होते; मात्र त्यांनी मोदी सरकारप्रमाणे विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर केला नव्हता, असे ते म्हणाले.हुकूमशाही राजवट संपवा- केजरीवालच्अखिलेश यादव यांच्या मागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या मोदी सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीका केली आहे. ही हुकूमशाही प्रवृत्तीची व लोकशाहीविरोधी राजवट संपुष्टात आणा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक