शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बायकोने घराबाहेर काढलं, कोट्यवधींची संपत्ती हडपली; आता नवरा मागतोय भीक, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 11:23 IST

कमाल अहमद यांनी आता बॅनरवर मेसेज लिहून घेऊन मोहीम सुरू केली आहे. बायकोवर विश्वास ठेवू नका, ती तुम्हाला संपत्तीतून हाकलून देईल असं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका पतीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. तसेच एक बॅनर लावला आहे, ज्याद्वारे तो लोकांना पत्नींपासून सावध राहण्याचं आवाहन करत आहे. आपल्या पत्नीला पोटगी देण्यासाठी लोकांकडे भीक मागत आहे. त्यांची सुनावणी होत नसल्याचा आरोप देखील केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मिर्झापूर जिल्ह्यातील कटरा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील नटवा परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या कमाल अहमद यांचं 30 वर्षांपूर्वी 1992 मध्ये लग्न झालं होतं. कमाल अहमद ओमानमध्ये काम करतात. पाच वर्षांपूर्वी कमाल यांच्या पत्नीने कमाल, त्यांचा भाऊ आणि वडिलांना घराबाहेर काढल्याचा आरोप आहे. यासह त्यांची कोट्यवधींची मालमत्ता हडप केली आहे. 

कमाल अहमद यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नीने आपल्यावर खोटा फौजदारी खटला दाखल केला आहे आणि पोटगीसाठी कोर्टात केसही दाखल केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सतत कोर्टात चकरा मारून त्रस्त झाल्याचं कमाल यांनी सांगितलं. कुठेही सुनावणी होत नाही.

कमाल अहमद यांनी आता बॅनरवर मेसेज लिहून घेऊन मोहीम सुरू केली आहे. बायकोवर विश्वास ठेवू नका, ती तुम्हाला संपत्तीतून हाकलून देईल असं म्हटलं आहे. तसेच सुनावणी होत नाही. मी कतारमध्ये काम करतो. 1992 साली आमचं लग्न झालं. पत्नीने खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि आता आमची संपत्ती देखील घेतली असल्याचं कमाल यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश