शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Mirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 14:27 IST

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची.

ठळक मुद्देसाईखोम सनाटोंबा मैतई हे मीराबाईचे ज्येष्ठ बंधु आहेत. मीराबाईचा ऑलिंपक स्पर्धेतील खेळ पाहण्यासाठी त्यांनी 24 जुलैसाठी अगोदर सुट्टी घेतली होती. मैतई हे सध्या बंगळुरूत राहत असून ते भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहेत. 

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आणि मणिपूरची ही कन्या देशाची नायक ठरली. भारतात दाखल होताच तिचे जंगी स्वागत झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राजकारण्यांची सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तर शाही सोहळ्याचे आयोजन करून मीराबाईचा सत्कार केला. देशासाठी पदक जिंकणाऱ्या मीराबाईचे मोठे बंधु हेही सैन्य दलातून देशसेवा करत आहेत. 

मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची. सहा भावंडांतील ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडे ती घेऊन यायची. तिने आणलेली मोळी तिच्या मोठ्या भावांनाही उचलता येत नसे. त्यातीलच, साईखोम सनाटोंबा मैतई हे मीराबाईचे ज्येष्ठ बंधु आहेत. मीराबाईचा ऑलिंपक स्पर्धेतील खेळ पाहण्यासाठी त्यांनी 24 जुलैसाठी अगोदर सुट्टी घेतली होती. मैतई हे सध्या बंगळुरूत राहत असून ते भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहेत. 

मैतई यांनीच मीराबाईला वेटलिफ्टींगमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच, तिचा ऑलिंपकमधील सामना पाहण्यासाठी ते अतिशय उत्साही होते. कारण, यापूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये मीराबाईला आलेलं अपयश हेही आहे. या अपयशातून अतिशय धैर्याने, संयमाने आणि कष्टाने मीराबाईने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. मैतई यांनीही 2000-2006 या कालावधीत फुटबॉल खेळला आहे. मात्र, घरची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन वयाच्या 17 व्या वर्षीच ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यामुळे, आपले अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मीराबाईला प्रोत्साहन दिले, वेळोवेळी मदत केली. 

मीराबाई बनल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक

मणिपूर राज्य सरकारनं मीराबाईला १ कोटी अन् अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा केली. इम्फाळ येथे परतताच तिच्या स्वागताला गाड्यांचा मोठाचा मोठा ताफाच होता. पण, एवढं सगळं वैभव मिळूनही मीराबाईचे पाय आजही जमिनीवर आहेत. त्याची साक्ष देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, रौप्य पदक जिंकून मायदेशी परतल्यानंतर आपल्या भावासोबत त्या जेवण करताना दिसत आहेत.   

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Mirabai Chanuमीराबाई चानूIndian Armyभारतीय जवान