शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CAA: भाजपाच्या अल्पसंख्याक विभागातील सदस्यांचे राजीनामे; पक्षात भेदभाव होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 14:34 IST

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत राजीनामे

भोपाळ: सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यावरुन भाजपामधील अंतर्गत कलह समोर आले आहेत. सध्या देशभरात सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनं सुरू असताना भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या ४८ सदस्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात भेदभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. एखादं सरकार संसदेत कायदा मंजूर करुन घेत आणि मग घरोघरी जाऊन कायद्यासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतं, असं तुम्ही कधी पाहिलंय का?, असा सवाल आदिल खान यांनी उपस्थित केला. खान यांनी नुकताच भोपाळ जिल्ह्याच्या अल्पसंख्याक आघाडीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातले अनेक कार्यकर्ते मुस्लिम समुदायाबद्दल आक्षेपार्ह विधानं करत असल्याचा आरोपदेखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्यांपैकी अनेकांनी केला. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देताना ४८ जणांनी राज्य भाजपाच्या अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षांनादेखील पत्र लिहिलं. एकेकाळी शामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजेपयींच्या तत्त्वांनी चालणारा, भेदभाव न करणारा पक्ष आता पूर्णपणे बदलला आहे. पक्षात लोकशाही राहिलेली नाही. संपूर्ण पक्षावर दोन किंवा तीन नेत्यांचंच वर्चस्व आहे, अशा शब्दांत राजीनामा देताना सदस्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्यांच्या आरोपांवर भाष्य करण्यास भाजपा नेत्यांनी नकार दिला. काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपानं केला. देशहिताविरोधात काम करणाऱ्या नेत्यांनी आणि कम्युनिस्टांनी आमच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल केली. आमच्या कार्यकर्त्यांना चुकीची माहिती देण्यात आली, असा आरोप भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी केला.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा