शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, मास्क न घातल्यास भरावा लागेल 500 रुपये दंड, रेल्वे मंत्रालयाने कडक केले नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:15 IST

रेल्वे मंत्रालयाने आपल्या कोविड-19 नियमावलीला पुढील आदेशापर्यंत वाढवले आहे.

नवी दिल्ली: दसरा आणि दिवाळी या काळात सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करणाऱ्यांची खूप गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिंसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कोविड-19 नियमावली सहा महिने किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली आहे. आदेशानुसार, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

17 एप्रिल 2021 रोजी भारतीय रेल्वेने स्टेशनवर मास्क घालण्याबाबत विशेष गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. त्या अधिसूचनेची वैधता या महिन्यात 16 ऑक्टोबर रोजी संपणार होती. पण, आता दसरा-दिवळीसारख्या सणांना होणाऱ्या गर्दीमुळे 17 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत रेल्वेने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, गाइडलाइन्स 16 एप्रिल 2022 पर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 22 हजार रुग्णांची वाढ

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात सुमारे 22 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 56 टक्के कोविड प्रकरणे केरळमधून नोंदवण्यात आली होती. अद्यापही अशी 5 राज्ये आहेत जिथे अजूनही 10 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. केरळमध्ये सुमारे 1,22,000 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात जवळपास 36,000 आहेत. तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकमध्येही सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या