शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, मास्क न घातल्यास भरावा लागेल 500 रुपये दंड, रेल्वे मंत्रालयाने कडक केले नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:15 IST

रेल्वे मंत्रालयाने आपल्या कोविड-19 नियमावलीला पुढील आदेशापर्यंत वाढवले आहे.

नवी दिल्ली: दसरा आणि दिवाळी या काळात सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करणाऱ्यांची खूप गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिंसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कोविड-19 नियमावली सहा महिने किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली आहे. आदेशानुसार, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

17 एप्रिल 2021 रोजी भारतीय रेल्वेने स्टेशनवर मास्क घालण्याबाबत विशेष गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. त्या अधिसूचनेची वैधता या महिन्यात 16 ऑक्टोबर रोजी संपणार होती. पण, आता दसरा-दिवळीसारख्या सणांना होणाऱ्या गर्दीमुळे 17 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत रेल्वेने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, गाइडलाइन्स 16 एप्रिल 2022 पर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 22 हजार रुग्णांची वाढ

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात सुमारे 22 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 56 टक्के कोविड प्रकरणे केरळमधून नोंदवण्यात आली होती. अद्यापही अशी 5 राज्ये आहेत जिथे अजूनही 10 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. केरळमध्ये सुमारे 1,22,000 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात जवळपास 36,000 आहेत. तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकमध्येही सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या