शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:27 IST

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात आतापर्यंत २७५ ...

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात आतापर्यंत २७५ जणांना जीव गमवावा लागला. यापैकी २४१ हे एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी होती. हे सर्वजण लंडन येथे जात होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं आणि मोठी जीवितहानी झाली. या भीषण दुर्घटनेवर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली आहे. पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला माहिती दिली होती पण त्यांचा नंतर संपर्क होऊ शकला नाही असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांनी सांगितले.

अहमदाबादमध्येएअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन एआय-१७१ हे ड्रिमलायनर विमान गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. एअर इंडियाचं ड्रीमलायनर विमान विमानतळापासून जवळच असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी क्वार्टर व मेस हॉलमध्ये कोसळलं. या दुर्घटनेचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या अपघाताबाबत माहिती दिली आहे. अपघातापूर्वी विमानाने पॅरिसहून दिल्ली आणि नंतर दिल्लीहून अहमदाबादला कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास केला होता, असं सरकारने शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

"विमानाने दुपारी १:३९ वाजता उड्डाण केले. सुमारे ६५० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर, त्याची उंची कमी होऊ लागली. वैमानिकाने दुपारी १:३९ वाजता एटीसीला  आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली. एटीसीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. १ मिनिटानंतर, विमान विमानतळापासून २ किमी अंतरावर असलेल्या मेघानी नगर भागात कोसळले. या अपघातापूर्वी त्या विमानाने पॅरिसहून दिल्ली आणि दिल्लीहून अहमदाबादला कोणत्याही अडचणीशिवाय उड्डाण पूर्ण केले होते. अपघातामुळे, विमानतळ दुपारी २.३० वाजता बंद करण्यात आले. सर्व प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर ते संध्याकाळी ५ वाजता उघडण्यात आले," असं मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. "गेले दोन दिवस खूप कठीण गेले. अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. काय करावे, कोणती मदत करावी हे पाहण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी गेलो होतो आणि गुजरात सरकारचाही असाच दृष्टिकोन होता. भारत सरकार आणि मंत्रालयातील इतरांचाही असाच दृष्टिकोन होता. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसले की सर्व संबंधित विभागांची पथके काम करत होती, शक्य तितके बचाव करण्याचा प्रयत्न करत होते, आग विझवण्याचा आणि ढिगारा काढण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून मृतदेह लवकरात लवकर रुग्णालयात पाठवता येतील, असं राम मोहन नायडू किंजरापु म्हणाले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया