शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Petrol Diesel Price: 'पेट्रोल २०० रुपये लीटर झालं तर ट्रिपल सीट प्रवास करा', भाजपा नेत्यानं जखमेवर मीठ चोळलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 15:19 IST

कोरोना विरोधाच्या संकटाला देश सामोरं जात असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनंही सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे.

नवी दिल्ली-

कोरोना विरोधाच्या संकटाला देश सामोरं जात असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनंही सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. यातच सत्ताधारी भाजपा सरकारमधील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महागाईनं ग्रासलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जात असल्याचं दिसून येत आहे. कोरोना विरोधातील लढाईत खूप खर्च येत असल्यानं त्याची भरपाई तेलाच्या वाढत्या दरातून केली जात असल्याचं वक्तव्य असो किंवा मग सर्वांना मोफत लसीचा खर्च सरकार करतंय म्हणूनच पेट्रोल-डिझेलवरील कर वाढविण्यात आल्याचं विधान असो. त्यात आता आणखी एका विधानाची भर पडली आहे. देशात पेट्रोल २०० रुपयी प्रतिलीटर झालं तर मोटारसायकवरुन ट्रिपल सीट प्रवास करावा असा अजब सल्ला भाजपा नेत्यानं केलं आहे. 

आसाम भाजपाचे प्रमुख भावेत कालिता यांनी पेट्रोल २०० रुपये प्रतिलीटर झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेनं काय करावं याचं उत्तर दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकार दुचाकीवर दोन ऐवजी तीन लोकांना प्रवासाला परवानगी देईल असं म्हटलं आहे. आलिशान कार न वापरता लोकांनी दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करावा असं अजब तर्कट भाजप नेते भावेत कालिता यांनी मांडलं आहे. काँग्रेसनं कालिता यांच्या विधानाला कडाडून विरोध केला आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलBJPभाजपा