शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

'त्या' योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडेल 7 लाख कोटींचा भार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 11:49 IST

देशातील 25 टक्के गरीब कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला दिल्या जाणाऱ्या किमान उत्पन्न हमी योजनेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर जवळपास 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भार पडू शकतो, असा अंदाज सुरुवातीला दिसून येत आहे.

ठळक मुद्देकिमान उत्पन्न हमी योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडेल 7 लाख कोटींचा भार!आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रसेची सत्ता आल्यास देशात किमान उत्पन्न हमी योजना राबवली जाईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशातील 25 टक्के गरीब कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला दिल्या जाणाऱ्या किमान उत्पन्न हमी योजनेमुळे  केंद्र सरकारच्या तिजोरीवर जवळपास 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भार पडू शकतो, असा अंदाज सुरुवातीला दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रसेची सत्ता आल्यास देशात किमान उत्पन्न हमी योजना राबवली जाईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावर एका मुलाखतीदरम्यान बोलताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले की, अकुशल कामगारांसाठी किमान वेतन दिवसाला 321 रुपये याप्रमाणे महिन्याला 9 हजार 630 रुपये इतके केंद्राकडून द्यावे लागतील. यामध्ये 18 ते 20 टक्के कुटुंबांचा विचार केला असता जवळपास पाच लाख कोटीं इतका खर्च अपेक्षित आहे.

युनिव्हर्सल किमान उत्पन्नासाठी दोन वर्षापूर्वी केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, सर्वात गरीब २५ टक्के कुटुंबाना वर्षाला 7,620 रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, अनेक प्रकारच्या सबसिडी मागे घेण्यास सरकारच्या असमर्थपणामुळे हा प्रस्ताव लागू करण्यात आला नाही. सर्व्हेनुसार, देशातील सर्वात गरीब 25 टक्के कुटुंबातील पाच सदस्यांना किमान उत्पन्न हमी गृहित धरुन अंदाज घेतला होता. त्यानुसार प्रत्येक सदस्याला दर महिन्याला 3,180 रुपये देण्यात आले तर सरकारला वर्षाला 1.75 लाख कोटी रुपये खर्च येईल, असे सांगण्यात आले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBudget 2019अर्थसंकल्प 2019