शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

किमान हमीभावाची मागणी पूर्ण व्हावी; महापंचायतीत शेतकऱ्यांची मागणी, केंद्राविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 05:25 IST

ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीत आणण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या कृषी क्षेत्राबाबतच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित ‘किसान मजदूर महापंचायत’मध्ये भाग घेण्यासाठी गुरुवारी येथील रामलीला मैदानावर शेतकरी मोठ्या संख्येने जमले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घोषणाबाजी केली.

२०२०-२१ मध्ये दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) या शेतकरी संघटनांच्या एक छत्री संघटनेने ‘किसान मजदूर महापंचायत’मध्ये एक ठराव मंजूर केला जाईल, असे म्हटले होते. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

केंद्राची धोरणे शेतकरी समर्थक असावीत, अशी आमची इच्छा आहे. पिकांवर किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ही आमची मागणी पूर्ण व्हावी, अशी मागणी पंजाबच्या पटियाला येथील शेतकरी हरमन सिंग यांनी केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भडकलेल्या हिंसाचारातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, असे भटिंडा येथील शेतकरी रविंदर सिंग म्हणाले.

ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीत आणण्यास मनाई

- शेतकऱ्यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्य दिल्लीकडे जाणारे रस्ते टाळण्यासाठी प्रवाशांसाठी वाहतूक सल्ला जारी केला आहे. दिल्लीच्या सीमेवर तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांची संख्याही वाढवण्यात आली आहे. 

- शेतकऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टर- ट्रॉलींसह राजधानीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केली आहे. दिल्ली पोलिसांनी ५,००० पेक्षा जास्त लोकांचा मेळावा होणार नाही, या अटीवर शेतकऱ्यांना कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर- ट्रॉली दिल्लीत न आणण्यास आणि रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यास सांगण्यात आले आहे.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन