शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

"१५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार, व्हिडीओ आला नसता तर PM बोलले नसते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:56 IST

manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. 

Manipur Violence । नवी दिल्ली : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं अनेकांना धक्का बसला. मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून छळ करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरून पंतप्रधाननरेंद्र मोदींसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मोदींच्या या आश्वासनानंतर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारला उशीरा जाग आली असल्याचे म्हटले.

ओवेसी म्हणाले की, अखेर मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं. दोन महिन्यांनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पण त्या संतापजनक व्हिडीओवर पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया देतील का, या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे. मणिपूरमध्ये १६० लोक मारले गेले, ज्या अनेक महिलांवर बलात्कार झाला आणि ५० हजारहून अधिक लोक बेघर झाले, त्यांना भाजपचे मुख्यमंत्री न्याय देतील का?, असा प्रश्नही ओवेसींनी केला. 

तसेच व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून पंतप्रधानांना प्रतिक्रिया देणे भाग पडले. असं झालं नसतं तर त्यांनी प्रतिक्रिया दिली नसती. मणिपूरमध्ये १५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर शेतात नेऊन अत्याचार केला जातो यावर मोदी काय बोलणार का? तेथील मुख्यमंत्र्यांना हटवले जाईल आणि पंतप्रधान सीबीआय चौकशीचे आदेश देतील तेव्हाच पीडितांना न्याय मिळेल, असेही ओवेसींनी नमूद केले.

अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना निर्देशमणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच, घटनेतील मुख्य आरोपीला थाउबल येथून अटक केल्याचेही समजते. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानsexual harassmentलैंगिक छळAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी