शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

गोडसेबद्दल तुमचं मत काय?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 10:52 IST

मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर ओवेसींनी साधला निशाणा

ठळक मुद्देओवेसींनी ट्विटरद्वारे केले सवालगांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? याचं उत्तर मोहन भागवत देतील का? ओवेसींचा सवाल

"माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. मी माझा धर्म समजूनच एक चांगला देशभक्त बनेन आणि लोकांनाही असेच करायला सांगेन. एवढंच नाही, तर स्वराज्य समजून घ्यायचे असेल, तर स्वधर्माला समजून घ्यावे लागेल असं महात्मा गांधी म्हणाले होते," असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांनी केलं होतं. ते 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज' नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या वक्तव्यावरून एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यावरून एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. तसंच गोडसेबाबत तुमचं मत काय आहे? असा सवालही केला आहे.

"गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? याचं उत्तर मोहन भागवत देतील का? नेल्ली येथे झालेल्या हत्याकांडाबाबत, तसंच १९८४ मधील शीख विरोध आणि २०२० मधील घटनेबद्दल काय विचार आहेत?," असे सवाल ओवेसी यांनी मोहन भागवत यांना केले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारले.

"धर्म कोणताही असला तरी बहुतांश भारतीय देशभक्त आहेत हे मानणं तर्कसंगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतच एका धर्माच्या लोकांना आपोआप देशभक्तीचं प्रमाणपत्र दिलं जातं. तर इतरांचं जीवन आपण या ठिकाणी अस्तित्वात आहोत हे सिद्ध करण्यात आणि आपण भारतीय आहोत हे सांगण्यातच निघून जातं," असंही ओवेसी म्हणाले. 

काय म्हणाले होते भागवत ?"पूजा पद्धती, कर्मकांड कुठलेही असोत, मात्र, सर्वांनी एकत्रितपणे रहायला हवं. फरक म्हणजे फाटाफूट नव्हे (difference doesn't mean separatism). जोवर मनात ही भीती असेल, की तुमच्या असल्याने माझ्या अस्तित्वाला धोका आहे आणि आपल्याला माझ्या असल्याने आपल्या अस्तित्वाचा धोका वाटेल, तोवर सौदे तर होऊ शकतात, पण आत्मीयता निर्माण होऊ शकत नाही," असं भागवत म्हणाले होते. 

"वेगळे असल्याचा अर्थ असा नाही, की आपण एका समाजाचे अथवा एक धरतीचे पुत्र बनून राहू शकत नाही. एवढेच नाही, तर पुस्तकाचे नाव आणि माझ्या हस्ते त्याचे प्रकाशन, याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो, की हा गांधीजींना आपल्या सोयीनुसार परिभाषित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापुरुषांना कुणीही आपल्या सोयीनुसार परिभाषित करू शकत नाही. हे पुस्तक व्यापक संशोधनावर आधारलेले आहे आणि ज्यांचे मत यापेक्षा वेगळे असेल, तेदेखील संशोधन करून लिहू शकतात," असंही भागवत म्हणाले होते.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसे