शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

केरळात लाखो बेघर, घरे, शेती उद्ध्वस्त; ११ जिल्ह्यांत आणखी अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 02:20 IST

लोकांमध्ये कमालीची घबराट; देवभूमी पूर्वपदावर येण्यास लागणार अनेक वर्षे लागणार

तिरूअनंतरपूरम : केरळमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी व त्यामुळे आलेले पूर यांत लाखो लोक बेघर झाले आहेत. पावसामुळे सर्व धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात येत असून, त्यामुळे रस्ते, घरे, दुकाने सारेच पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा तडाखा व जोरदार वारे यांमुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. कच्च्याच नव्हे, तर पक्क्या घरांचेही प्रचंड नुकसान झाले असून, अशी एक लाखांहून अधिक घरे राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. आताची स्थिती पाहता, राज्य पूर्वपदावर येण्यास अनेक वर्षे लागणार आहेत.भातशेतीबरोबरच कॉफी व केळीच्या बागा नष्ट झाल्या आहेत. केळीचे खांब उलथून पडल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. शेतांतील पाणी ओसरण्यास बराच काळ लागणार आहे. त्यातच आणखी दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये दोन हजार शिबिरे सुरू असून, त्यात ३ लाखांहून अधिक लोक राहत आहेत. आपणास पुन्हा घरी कधी जाता येईल, हे त्यांना कळेनासे झाले आहे. खालसा एड या आंतरराष्ट्रीय शीख संस्थेने केरळमध्ये अनेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. संस्थेचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात शिबिरांच्या ठिकाणी तसेच अन्यत्रही चपात्या, भात, भाजी तयार करून वाटत आहेत. दुबईतही संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारतर्फे मदतीसाठी संस्था स्थापन केली आहे. मदतीसाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांनी केले आहे. अरब राष्ट्रांत नोकरीसाठी गेलेल्या केरळी लोकांची संख्या काही लाखांमध्ये असल्याने तेथील सरकारने हे पाऊल उचलले आहे.बचावकार्यात अडचणीपाणी ओसरले नसल्याने आणि पाऊ स सुरूच असल्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच आहे. लष्करातर्फे तात्पुरते पूल उभारण्याचे काम सुरू आहे, तर तेथील रस्त्यांची लगेच डागडुजी करण्याचे आणि नंतर ते पूर्ववत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.केरळचा सार्वजनिक बांधकाम विभागही रस्तेदुरुस्तीच्या कामाला लागला असून, रस्त्यांवर पडलेली झाडे तेथून हटवणे हेही मोठे काम होऊ न बसले आहे.घरदार, शेती सारेच नष्ट झाल्याने अनेक जण मानसिकरित्या पुरते खचले आहेत, तर काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे वा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात जखमींबरोबरच मानसिक आजारांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठी असून, त्यात केवळ वृद्धच नव्हे, तर तरुण व लहान मुलेही आहेत. शाळा, महाविद्यालये कित्येक दिवसांपासून बंद आहेत. रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.पावसाच्या सततच्या तडाख्यांमुळे सुमारे १0 हजार किलोमीटरचे रस्ते एक तर वाहून गेले आहेत, खचले आहेत वा त्यावर इतके खड्डे पडले आहेत की त्यावरून वाहने चालविणे आणि चालणेही धोक्याचे झाले आहे. बºयाच पुलांची अवस्थाही वाईट असून, काही पूल धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. ते ओसरल्यानंतर पुलांवर कचºयाचे ढिग दिसू लागले असून, ते हटविण्याचे काम सुरू आहे.अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना अंधारात राहावे लागत आहे, मोबाइल चार्ज करता येत नसल्याने इतरांशी संपर्क तुटला आहे. पिण्याचे पाणीही दुषित झाले असून, पुण्यासह अनेक राज्यांतून तिथे रेल्वेने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अन्नधान्य पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, तर अन्नधान्य तसेच आर्थिक मदत पाठविण्यासाठी ती गोळा करण्याचे काम बºयाच संस्थांनी सुरू केले आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRainपाऊस