शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

केरळात लाखो बेघर, घरे, शेती उद्ध्वस्त; ११ जिल्ह्यांत आणखी अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 02:20 IST

लोकांमध्ये कमालीची घबराट; देवभूमी पूर्वपदावर येण्यास लागणार अनेक वर्षे लागणार

तिरूअनंतरपूरम : केरळमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी व त्यामुळे आलेले पूर यांत लाखो लोक बेघर झाले आहेत. पावसामुळे सर्व धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात येत असून, त्यामुळे रस्ते, घरे, दुकाने सारेच पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा तडाखा व जोरदार वारे यांमुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. कच्च्याच नव्हे, तर पक्क्या घरांचेही प्रचंड नुकसान झाले असून, अशी एक लाखांहून अधिक घरे राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. आताची स्थिती पाहता, राज्य पूर्वपदावर येण्यास अनेक वर्षे लागणार आहेत.भातशेतीबरोबरच कॉफी व केळीच्या बागा नष्ट झाल्या आहेत. केळीचे खांब उलथून पडल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. शेतांतील पाणी ओसरण्यास बराच काळ लागणार आहे. त्यातच आणखी दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये दोन हजार शिबिरे सुरू असून, त्यात ३ लाखांहून अधिक लोक राहत आहेत. आपणास पुन्हा घरी कधी जाता येईल, हे त्यांना कळेनासे झाले आहे. खालसा एड या आंतरराष्ट्रीय शीख संस्थेने केरळमध्ये अनेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. संस्थेचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात शिबिरांच्या ठिकाणी तसेच अन्यत्रही चपात्या, भात, भाजी तयार करून वाटत आहेत. दुबईतही संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारतर्फे मदतीसाठी संस्था स्थापन केली आहे. मदतीसाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांनी केले आहे. अरब राष्ट्रांत नोकरीसाठी गेलेल्या केरळी लोकांची संख्या काही लाखांमध्ये असल्याने तेथील सरकारने हे पाऊल उचलले आहे.बचावकार्यात अडचणीपाणी ओसरले नसल्याने आणि पाऊ स सुरूच असल्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच आहे. लष्करातर्फे तात्पुरते पूल उभारण्याचे काम सुरू आहे, तर तेथील रस्त्यांची लगेच डागडुजी करण्याचे आणि नंतर ते पूर्ववत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.केरळचा सार्वजनिक बांधकाम विभागही रस्तेदुरुस्तीच्या कामाला लागला असून, रस्त्यांवर पडलेली झाडे तेथून हटवणे हेही मोठे काम होऊ न बसले आहे.घरदार, शेती सारेच नष्ट झाल्याने अनेक जण मानसिकरित्या पुरते खचले आहेत, तर काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे वा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात जखमींबरोबरच मानसिक आजारांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठी असून, त्यात केवळ वृद्धच नव्हे, तर तरुण व लहान मुलेही आहेत. शाळा, महाविद्यालये कित्येक दिवसांपासून बंद आहेत. रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.पावसाच्या सततच्या तडाख्यांमुळे सुमारे १0 हजार किलोमीटरचे रस्ते एक तर वाहून गेले आहेत, खचले आहेत वा त्यावर इतके खड्डे पडले आहेत की त्यावरून वाहने चालविणे आणि चालणेही धोक्याचे झाले आहे. बºयाच पुलांची अवस्थाही वाईट असून, काही पूल धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. ते ओसरल्यानंतर पुलांवर कचºयाचे ढिग दिसू लागले असून, ते हटविण्याचे काम सुरू आहे.अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना अंधारात राहावे लागत आहे, मोबाइल चार्ज करता येत नसल्याने इतरांशी संपर्क तुटला आहे. पिण्याचे पाणीही दुषित झाले असून, पुण्यासह अनेक राज्यांतून तिथे रेल्वेने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अन्नधान्य पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, तर अन्नधान्य तसेच आर्थिक मदत पाठविण्यासाठी ती गोळा करण्याचे काम बºयाच संस्थांनी सुरू केले आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRainपाऊस