शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

तिबेटी सैनिक निमा तेनझीन यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; भारताचा चीनला थेट संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 07:03 IST

लडाख सीमेवर भूसुरुंग स्फोटात वीरमरण; स्वतंत्र तिबेटच्या दिल्या घोषणा

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या भारत-चीन सीमावादात भारतीय लष्कराने केलेल्या एका कारवाईत भूसुरुंग स्फोटात तिबेटियन स्पेशल फ्रंटिअर फोर्समधील मूळ तिबेटियन कंपनी कमांडर निमा तेनझीन यांना वीरमरण आले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर लेह येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित तिबेटी नागरिकांनी स्वतंत्र तिबेटच्या घोषणा देत भारत आणि तिबेटच्या ध्वज फिरवत चिनी नेतृत्वाला थेट आव्हान दिले.

२९-३० ऑगस्टदरम्यान स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या विकास बटालियनने पेंगाँत्से सरोवराच्या दक्षिण भागातील मोक्याच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवले. यादरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात एसएफएफ दलातील कंपनी कमांडर निमा तेनझीन यांना वीरमरण आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता राम माधव, तसेच स्थानिक खासदार उपस्थित होते.

याबाबत संरक्षक विश्लेषक निवृत्त मेजर जनरल डी.के. मेहता यांनी सांगितले, की भारताने ‘वन चीन पॉलिसी’ स्वीकारली. त्याअंतर्गत तिबेटला चीनचा भाग्य असल्याचे मान्य करण्याचा मुद्दाही होता. मात्र, चीन सातत्याने सीमेवर कुरापती करीत असतो. एवढेच नव्हे तर पाकव्याप्त भारतीय भूभागात चीन रस्त्यांचे जाळे तयार करीत आहेत. यामुळे तिबेटबाबतच्या धोरणात भारताने बदल करणे गरजेचे होते.

१९६२ मध्ये स्पेशल फ्रंटिअर फोर्सची झाली होती स्थापना

1962 युद्धानंतर भारतात शरण आलेल्या तिबेटी नागरिकांच्या मदतीने ‘स्पेशल फ्रंटिअर फोेर्स’ची स्थापना केली होती. यापूर्वी तिला ‘एस्टॅब्लिशमेंट २२’ या नावाने ओळखले जात होते. याआधी भारताने उघडरीत्या या फोर्सबाबत वक्तव्य केले नव्हते. मात्र, भारताने आता तिबेट धोरणाबाबत बदल करीत चीनला थेट संदेश देण्याचे ठरवले आहे.

2018 मध्ये तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या ६० वर्षांच्या निर्वासित दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांपासून भारतीय नेत्यांना दूर राहण्यास केंद्र सरकारने सांगितले होते. कारण तिबेट हा चीनचा भाग आहे, हे भारतीयांनी आधीपासून मान्य केले आहे. मात्र, भारत आता या भूमिकेत बदल करीत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन