शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

तिबेटी सैनिक निमा तेनझीन यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; भारताचा चीनला थेट संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 07:03 IST

लडाख सीमेवर भूसुरुंग स्फोटात वीरमरण; स्वतंत्र तिबेटच्या दिल्या घोषणा

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या भारत-चीन सीमावादात भारतीय लष्कराने केलेल्या एका कारवाईत भूसुरुंग स्फोटात तिबेटियन स्पेशल फ्रंटिअर फोर्समधील मूळ तिबेटियन कंपनी कमांडर निमा तेनझीन यांना वीरमरण आले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर लेह येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित तिबेटी नागरिकांनी स्वतंत्र तिबेटच्या घोषणा देत भारत आणि तिबेटच्या ध्वज फिरवत चिनी नेतृत्वाला थेट आव्हान दिले.

२९-३० ऑगस्टदरम्यान स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या विकास बटालियनने पेंगाँत्से सरोवराच्या दक्षिण भागातील मोक्याच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवले. यादरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात एसएफएफ दलातील कंपनी कमांडर निमा तेनझीन यांना वीरमरण आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता राम माधव, तसेच स्थानिक खासदार उपस्थित होते.

याबाबत संरक्षक विश्लेषक निवृत्त मेजर जनरल डी.के. मेहता यांनी सांगितले, की भारताने ‘वन चीन पॉलिसी’ स्वीकारली. त्याअंतर्गत तिबेटला चीनचा भाग्य असल्याचे मान्य करण्याचा मुद्दाही होता. मात्र, चीन सातत्याने सीमेवर कुरापती करीत असतो. एवढेच नव्हे तर पाकव्याप्त भारतीय भूभागात चीन रस्त्यांचे जाळे तयार करीत आहेत. यामुळे तिबेटबाबतच्या धोरणात भारताने बदल करणे गरजेचे होते.

१९६२ मध्ये स्पेशल फ्रंटिअर फोर्सची झाली होती स्थापना

1962 युद्धानंतर भारतात शरण आलेल्या तिबेटी नागरिकांच्या मदतीने ‘स्पेशल फ्रंटिअर फोेर्स’ची स्थापना केली होती. यापूर्वी तिला ‘एस्टॅब्लिशमेंट २२’ या नावाने ओळखले जात होते. याआधी भारताने उघडरीत्या या फोर्सबाबत वक्तव्य केले नव्हते. मात्र, भारताने आता तिबेट धोरणाबाबत बदल करीत चीनला थेट संदेश देण्याचे ठरवले आहे.

2018 मध्ये तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या ६० वर्षांच्या निर्वासित दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांपासून भारतीय नेत्यांना दूर राहण्यास केंद्र सरकारने सांगितले होते. कारण तिबेट हा चीनचा भाग आहे, हे भारतीयांनी आधीपासून मान्य केले आहे. मात्र, भारत आता या भूमिकेत बदल करीत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन