शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तिबेटी सैनिक निमा तेनझीन यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; भारताचा चीनला थेट संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 07:03 IST

लडाख सीमेवर भूसुरुंग स्फोटात वीरमरण; स्वतंत्र तिबेटच्या दिल्या घोषणा

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या भारत-चीन सीमावादात भारतीय लष्कराने केलेल्या एका कारवाईत भूसुरुंग स्फोटात तिबेटियन स्पेशल फ्रंटिअर फोर्समधील मूळ तिबेटियन कंपनी कमांडर निमा तेनझीन यांना वीरमरण आले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर लेह येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित तिबेटी नागरिकांनी स्वतंत्र तिबेटच्या घोषणा देत भारत आणि तिबेटच्या ध्वज फिरवत चिनी नेतृत्वाला थेट आव्हान दिले.

२९-३० ऑगस्टदरम्यान स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या विकास बटालियनने पेंगाँत्से सरोवराच्या दक्षिण भागातील मोक्याच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवले. यादरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात एसएफएफ दलातील कंपनी कमांडर निमा तेनझीन यांना वीरमरण आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता राम माधव, तसेच स्थानिक खासदार उपस्थित होते.

याबाबत संरक्षक विश्लेषक निवृत्त मेजर जनरल डी.के. मेहता यांनी सांगितले, की भारताने ‘वन चीन पॉलिसी’ स्वीकारली. त्याअंतर्गत तिबेटला चीनचा भाग्य असल्याचे मान्य करण्याचा मुद्दाही होता. मात्र, चीन सातत्याने सीमेवर कुरापती करीत असतो. एवढेच नव्हे तर पाकव्याप्त भारतीय भूभागात चीन रस्त्यांचे जाळे तयार करीत आहेत. यामुळे तिबेटबाबतच्या धोरणात भारताने बदल करणे गरजेचे होते.

१९६२ मध्ये स्पेशल फ्रंटिअर फोर्सची झाली होती स्थापना

1962 युद्धानंतर भारतात शरण आलेल्या तिबेटी नागरिकांच्या मदतीने ‘स्पेशल फ्रंटिअर फोेर्स’ची स्थापना केली होती. यापूर्वी तिला ‘एस्टॅब्लिशमेंट २२’ या नावाने ओळखले जात होते. याआधी भारताने उघडरीत्या या फोर्सबाबत वक्तव्य केले नव्हते. मात्र, भारताने आता तिबेट धोरणाबाबत बदल करीत चीनला थेट संदेश देण्याचे ठरवले आहे.

2018 मध्ये तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या ६० वर्षांच्या निर्वासित दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांपासून भारतीय नेत्यांना दूर राहण्यास केंद्र सरकारने सांगितले होते. कारण तिबेट हा चीनचा भाग आहे, हे भारतीयांनी आधीपासून मान्य केले आहे. मात्र, भारत आता या भूमिकेत बदल करीत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन