शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

Jammu Kashmir Target Killing: 'टार्गेट किलिंग'मुळे काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण, रेल्वे अन् बस स्थानकांवर परराज्यातील मजुरांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 18:53 IST

Jammu Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असताना आता परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Jammu Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असताना आता परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रवासी मजूर आपल्या कुटुंबियांसह काश्मीरमधून बाहेर पडण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. दहशतवाद्यांकडून अल्पसंख्याक आणि परराज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये उदरनिर्वाह करत असलेल्या परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर प्रवासी मजुरांची घरी परतण्यासाठी लांबच लाब रांग लागलेली पाहायला मिळाली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि उधमपूरमध्ये रेल्वे स्थानकं, बसं स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कारण या स्थानकांवर प्रवासी संख्या वाढली आहे. सर्वजण आपापल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे व बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. मंगळवारी जम्मू रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी मजुरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. 

हिवाळ्याआधीच परतीच्या प्रवासाला निघतात मजूरउत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तराखंडमधून जवळपास ३ ते ४ लाख मजूर दरवर्षी नोकरीच्या शोधात काश्मीरमध्ये येतात. घर उभारणी, वेल्डिंग आणि शेतीच्या कामांसाठी हे मजूर काश्मीरमध्ये येत असतात. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तापमान घसरण्याआधीच हे मजूर आपापल्या राज्यात परत जात असतात. पण गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. परराज्यातील व्यक्तींना दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे. मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे वेळेआधीच सर्व मजूर आपापल्या राज्यात परतण्यासाठी रेल्वे, बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. 

गेल्या रविवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका घरात घुसून बिहारच्या दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर याआधी एका बिहारी पाणीपुरीवाल्याचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती. आतापर्यंत ११ नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीBiharबिहार