शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

Jammu Kashmir Target Killing: 'टार्गेट किलिंग'मुळे काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण, रेल्वे अन् बस स्थानकांवर परराज्यातील मजुरांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 18:53 IST

Jammu Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असताना आता परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Jammu Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असताना आता परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रवासी मजूर आपल्या कुटुंबियांसह काश्मीरमधून बाहेर पडण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. दहशतवाद्यांकडून अल्पसंख्याक आणि परराज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये उदरनिर्वाह करत असलेल्या परराज्यातील मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर प्रवासी मजुरांची घरी परतण्यासाठी लांबच लाब रांग लागलेली पाहायला मिळाली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि उधमपूरमध्ये रेल्वे स्थानकं, बसं स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कारण या स्थानकांवर प्रवासी संख्या वाढली आहे. सर्वजण आपापल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे व बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. मंगळवारी जम्मू रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी मजुरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. 

हिवाळ्याआधीच परतीच्या प्रवासाला निघतात मजूरउत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तराखंडमधून जवळपास ३ ते ४ लाख मजूर दरवर्षी नोकरीच्या शोधात काश्मीरमध्ये येतात. घर उभारणी, वेल्डिंग आणि शेतीच्या कामांसाठी हे मजूर काश्मीरमध्ये येत असतात. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तापमान घसरण्याआधीच हे मजूर आपापल्या राज्यात परत जात असतात. पण गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. परराज्यातील व्यक्तींना दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे. मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे वेळेआधीच सर्व मजूर आपापल्या राज्यात परतण्यासाठी रेल्वे, बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. 

गेल्या रविवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका घरात घुसून बिहारच्या दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर याआधी एका बिहारी पाणीपुरीवाल्याचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती. आतापर्यंत ११ नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीBiharबिहार