शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्यात केव्हाही ‘मध्यावधी’ निवडणूक!

By admin | Updated: November 19, 2014 09:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आज राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असे भाकीत वर्तविल्यामुळे राजकीय पतंगबाजीला पुन्हा ऊत आला.

शरद पवार यांचे भाकीत : मुख्यमंत्री म्हणतात, सरकारला धोका नाहीयदु जोशी, चोंढी (अलिबाग)राज्यातील भाजपाला सरकारला ‘स्थैर्य’ लाभावे म्हणून आतून-बाहेरून पाठिंबा देऊ केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आज राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असे भाकीत वर्तविल्यामुळे राजकीय पतंगबाजीला पुन्हा ऊत आला. तर दुसरीकडे, पवार काहीही म्हणोत आमचे सरकार स्थिर आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला!विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची कारणमीमांसा व भविष्यातील वाटचालीचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन दिवसांची बैठक आजपासून अलिबागजवळील चोंडी येथील एका रिसोर्टवर सुरू आहे. बैठकीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष (पान ५ वर) सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते असे निवडक २०० जण बैठकीत सहभागी झाले आहेत. पवार म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारला सरसकट पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेऊ शकत नाही. सरकारने वादग्रस्त विषयांत लक्ष घातले नाही, सामूहिकपणे विकासाचे निर्णय झाले नाहीत तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. सध्याची परिस्थिती दीर्घकालिन स्थिरतेला मदत करणारी दिसत नाही. ती आणखी बिघडली तर निवडणुकीला सामोरे जावे लागेल. राज्य चालविणे अशक्य झाले तर निवडणुकीला सामोरे जावू शकतो का याची चाचपणी करून भाजपाही मध्यावधी निवडणुकीचा विचार करू शकतो.ही वेळ कधी येईल याची आज खात्री देता येत नाही, त्यामुळे सर्वांनी निवडणुकीसाठी तयार राहावे, असे आवाहनही पवार यांनी केले.सिंचनाच्या कथित घोटाळ्यांची राज्य सरकारने खुशाल चौकशी करावी, असे आव्हान देऊन पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या मागणीखातर गरजेपेक्षा जास्त सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले हा भ्रष्टाचार नव्हता. आता सामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले असूनही कापसात क्विंटलमागे दीड हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)बहुमताचे प्रमाणपत्रविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिले. त्यांनी विरोधात मतदान केले नाही की बाजूने केले नाही. हे सरकार चालेल तितके चालेल. ते पाच वर्षे टिकविण्याचा मक्ता राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला नाही, असा इशारा देत भाजपाकडे १२२ आमदार होते. शिवसेनेकडे ६३, काँग्रेसकडे ४२ असे दोन्हींमिळून १०५ आमदार होतात. आम्ही तटस्थ होतो. याचा अर्थ भाजपाकडे बहुमत होते, असे प्रमाणपत्र पवार यांनी दिले.स्थिर सरकार - मुख्यमंत्रीराज्यातील सरकार स्थिर आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील जनतेने खूप अपेक्षेने सरकार निवडून दिले आहे. सरकारने ५ वर्षे काम करावे अशी जनतेची अपेक्षा आहे. विधानसभेतील एकाही पक्षाच्या आमदाराला मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील, असे वाटत नाही. सेनेकरिता चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत. त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.विरोधकाचीच भूमिका बजावणारमहाराष्ट्रातील मतदारराजाने पवारांना माफ करावे. ते केव्हा काय बोलतात ते त्यांना कळत नाही, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाने हे लक्षात घ्यावे की पवार बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत. आम्ही ठामपणे विरोधकांची भूमिका बजावणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणुकीला काँग्रेस तयारनिवडणुका कधीही झाल्या तरी त्याकरिता काँग्रेस तयार आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रावर भाजपा मध्यावधी निवडणुका लादू शकते. परंतु त्या परिस्थितीला आम्ही घाबरत नाही. उलटपक्षी निर्धाराने निवडणुकीचा सामना करू, असेही ठाकरे म्हणाले.