शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

नव्या मनुष्यबळ विकास मंत्र्यांची डिग्रीही वादात; नावासमोर डॉक्टर लावल्याने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:20 IST

पोखरियाल यांना श्रीलंकेतील एक विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. परंतु, हे विद्यापीठ श्रीलंकेतील नोंदणीकृत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ९० च्या दशकात कोलंबोमधील मुक्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निशंक यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डी.लीटने सन्मानित केले होते.

नवी दिल्ली - मनुष्यबळ विकास मंत्रालयातील पदवीचा वाद नवीन सरकारमध्ये देखील कायम असल्याचे चित्र आहे. नव्याने मनुष्यबळ विकास मंत्रीपदी विराजमान झालेले रमेश पोखरियाल निशंक यांची पदवी देखील खोटी असल्याचे आरोप होत आहेत. याआधीच्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

पोखरियाल यांना श्रीलंकेतील विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. परंतु, हे विद्यापीठ श्रीलंकेतील नोंदणीकृत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ९० च्या दशकात कोलंबोमधील मुक्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निशंक यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डी.लीटने सन्मानित केले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्याच विद्यापीठाकडून पोखरियाल यांना पुन्हा डी.लीटची पदवी बहाल करण्यात आली. यावेळी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना डी.लीटने सन्मानित करण्यात आले होते. परंतु, धक्कादायक म्हणजे हे विद्यापीठ श्रीलंकेत विदेशी किंवा अंतर्गत विद्यापीठ म्हणून नोंदणीकृतही नाही. श्रीलंकेतील विद्यापीठ अनुदान आयोगाने याची पुष्टी केली आहे.

गेल्या वर्षी देहरादूनमध्ये आरटीआय अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीत हे समोर आले आहे. आरटीआयमधून निशंक यांचा अर्धवट बायोडाटा प्राप्त झाला आहे. निशंक यांचा बायोडाटा आणि पासपोर्ट यातील जन्मतारिख देखील वेगवेगळ्या दिसून आल्या आहेत. बायोडाटामध्ये पोखरियाल यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५९ दाखविण्यात आला आहे. तर पासपोर्टमध्ये पोखरियाल यांची जन्मतारिख १५ जुलै १९५९ नमूद करण्यात आलेली आहे.

मुळात ५ जुलै १९५८ रोजी उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील पीनानी गावात जन्मलेले निशंक यांनी हेमवती बहुगुणा गढवाल विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली. त्यांच्याकडे पीएचडी ऑनर्स आणि डी.लीट ऑनर्स डिग्री आहे. जोशीमठ स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरस्वती शिशू विद्यामंदीरात त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.

स्मृती इराणींच्या डिग्रीवरही होते प्रश्नचिन्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या सरकारमधील मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून देखील वाद झाला होता. २००४ ते २०१४ या कालावधीत इराणी यांनी दिलेली आपली शैक्षणिक माहिती वेगवेगळी असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. २००४ साली स्मृती इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात दिल्ली विद्यापीठातून आर्टमध्ये डीग्री पूर्ण केल्याचे म्हटले होते. मात्र २०१४ मध्ये प्रतिज्ञापत्रात स्मृती यांनी दिल्ली विद्यापीठात वाणिज्य विभागातून डिग्री घेतल्याचे नमूद केले होते. या डिग्रीवरून २०१९ लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला होता.