शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नव्या मनुष्यबळ विकास मंत्र्यांची डिग्रीही वादात; नावासमोर डॉक्टर लावल्याने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:20 IST

पोखरियाल यांना श्रीलंकेतील एक विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. परंतु, हे विद्यापीठ श्रीलंकेतील नोंदणीकृत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ९० च्या दशकात कोलंबोमधील मुक्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निशंक यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डी.लीटने सन्मानित केले होते.

नवी दिल्ली - मनुष्यबळ विकास मंत्रालयातील पदवीचा वाद नवीन सरकारमध्ये देखील कायम असल्याचे चित्र आहे. नव्याने मनुष्यबळ विकास मंत्रीपदी विराजमान झालेले रमेश पोखरियाल निशंक यांची पदवी देखील खोटी असल्याचे आरोप होत आहेत. याआधीच्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

पोखरियाल यांना श्रीलंकेतील विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. परंतु, हे विद्यापीठ श्रीलंकेतील नोंदणीकृत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ९० च्या दशकात कोलंबोमधील मुक्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निशंक यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डी.लीटने सन्मानित केले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्याच विद्यापीठाकडून पोखरियाल यांना पुन्हा डी.लीटची पदवी बहाल करण्यात आली. यावेळी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना डी.लीटने सन्मानित करण्यात आले होते. परंतु, धक्कादायक म्हणजे हे विद्यापीठ श्रीलंकेत विदेशी किंवा अंतर्गत विद्यापीठ म्हणून नोंदणीकृतही नाही. श्रीलंकेतील विद्यापीठ अनुदान आयोगाने याची पुष्टी केली आहे.

गेल्या वर्षी देहरादूनमध्ये आरटीआय अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीत हे समोर आले आहे. आरटीआयमधून निशंक यांचा अर्धवट बायोडाटा प्राप्त झाला आहे. निशंक यांचा बायोडाटा आणि पासपोर्ट यातील जन्मतारिख देखील वेगवेगळ्या दिसून आल्या आहेत. बायोडाटामध्ये पोखरियाल यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५९ दाखविण्यात आला आहे. तर पासपोर्टमध्ये पोखरियाल यांची जन्मतारिख १५ जुलै १९५९ नमूद करण्यात आलेली आहे.

मुळात ५ जुलै १९५८ रोजी उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील पीनानी गावात जन्मलेले निशंक यांनी हेमवती बहुगुणा गढवाल विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली. त्यांच्याकडे पीएचडी ऑनर्स आणि डी.लीट ऑनर्स डिग्री आहे. जोशीमठ स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरस्वती शिशू विद्यामंदीरात त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.

स्मृती इराणींच्या डिग्रीवरही होते प्रश्नचिन्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या सरकारमधील मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून देखील वाद झाला होता. २००४ ते २०१४ या कालावधीत इराणी यांनी दिलेली आपली शैक्षणिक माहिती वेगवेगळी असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. २००४ साली स्मृती इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात दिल्ली विद्यापीठातून आर्टमध्ये डीग्री पूर्ण केल्याचे म्हटले होते. मात्र २०१४ मध्ये प्रतिज्ञापत्रात स्मृती यांनी दिल्ली विद्यापीठात वाणिज्य विभागातून डिग्री घेतल्याचे नमूद केले होते. या डिग्रीवरून २०१९ लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला होता.