शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

#MeToo : लैंगिक छळाचा आरोप झालेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर देणार मंत्रिपदाचा राजीनामा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 12:07 IST

लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अकबर यांच्यावर त्यांच्या काही पत्रकार महिला सहकाऱ्यांना लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या अकबर यांना दौरा अर्ध्यावर  सोडून मायदेशी परतण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. एम.जे. अकबर परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्याकडून पदाचा राजीनामा घेण्यात येऊ शकतो. अकबर यांच्यावर झालेले आरोप केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले आहेत. त्यामुळे वैयक्तिक कारणांचा हवाला देऊन अकबर हे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मात्र ते भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. देशात सुरू झालेल्या #MeToo मोहिमेंतर्गत अनेक महिला समोर येऊन आपल्या झालेल्या शोषणाला वाचा फोडत आहेत. लैंगिक छळाचा आरोप झालेल्यांपैकी बहुतेक जण मनोरंजन, चित्रपट व प्रसारमाध्यमांतील असून, अकबर हे असा आरोप झालेले पहिलेच राजकीय नेते आहेत.  परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी ते वृत्तपत्राचे संपादक असताना आमचा लैंगिक छळ केला होता, असा आरोप किमान सहा महिला पत्रकारांनी केला होता. इंडिया टुडे, द इंडियन एक्स्प्रेस, मिंटच्या प्रिया रामाणी या माजी पत्रकार असून, त्यांनी पहिल्यांदा अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ‘व्होग इंडिया’ला गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये लिहिलेल्या लेखात रामाणी यांनी अकबर यांच्याबरोबर आलेला अनुभव सांगितला आहे. त्या लिहितात, तेव्हा संपादक असलेल्या अकबर यांनी मला दक्षिण मुंबईतील त्यांच्या हॉटेलच्या खोलीत नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले.मी तेव्हा २३, तर अकबर ४३ वर्षांचे होते. या हॉटेलमध्ये ते नेहमीच मुक्कामाला असायचे. रामाणी यांनी म्हटले की, ती मुलाखत कमी आणि डेट जास्त होती व तीत त्यांनी मला ड्रिंक देऊन जुनी हिंदी गीते गायली. मला अकबर यांनी त्यांच्या बेडवरही बसायला सांगितले. बेडवर बसायला फारच छोटी जागा असल्याचे सांगून रामाणी यांनी त्याला नकार दिला होता.दरम्यान, अकबर यांच्याबाबत कोणताही निर्णय घेताना संपूर्ण विचार केला जाईल. आम्ही अविचाराने कोणताही निर्णय घेणार नाही, मात्र हे प्रकरण महिला सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे सरकारशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले आहे.  

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरCentral Governmentकेंद्र सरकारMetoo Campaignमीटू