शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

#MeToo: लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात अकबर उतरवणार 97 वकिलांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 09:30 IST

अकबर यांच्याकडून महिलेविरोधात मानहानीचा दावा

नवी दिल्ली: केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. विशेष म्हणजे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अकबर तब्बल 97 वकिलांची फौज न्यायालयात उभी करणार आहेत. अकबर यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी करांजवाला अँड कंपनी ही लॉ फॉर्म मैदानात उतरणार आहे. मात्र या 97 वकिलांपैकी केवळ 6 वकिलच प्रत्यक्ष न्यायालयात अकबर यांची बाजू मांडतील, असं करांजवाला अँड कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.एम. जे. अकबर यांच्याविरोधात सर्वप्रथम प्रिया रमानी यांनी आवाज उठवला. अकबर यांनी एका हॉटेलमध्ये बोलावून आपल्यासोबत गैरवर्तन केल्याची तक्रार रमानी यांनी केली. यानंतर आतापर्यंत तब्बल 10 महिलांनी अकबर यांनी केलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. या सर्व महिलांविरोधात कायदेशीर संघर्ष करण्याचा निर्णय अकबर यांनी केला आहे. आपल्यावरील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं अकबर यांनी म्हटलं आहे. रविवारी अकबर आफ्रिकेहून भारतात परतले. यानंतर सोमवारी त्यांच्या वकिलांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. एम. जे. अकबर संपादक पदावर असताना त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप 10 महिलांनी केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचं अकबर यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनंच हे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अकबर यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी करांजवाला अँड कंपनीकडे आहे. 'आमच्या लॉ फर्मकडे 100 वकील आहेत. यातील 6 जण गुन्हेगारी प्रकरणात अशिलाची बाजू मांडतात. तेच वकील या प्रकरणात अकबर यांच्या वतीनं युक्तीवाद करतील,' अशी माहिती लॉ फर्मच्या प्रवक्त्यांनी दिली. 

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo Campaignमीटूsexual harassmentलैंगिक छळ