शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

#MeToo : एका संपादकाचा राजीनामा, तर दुसरा संपादक सक्तीच्या रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 01:27 IST

लैंगिक शोषणाविरुद्ध महिलांनी सुरु केलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर अन्य क्षेत्रांतही हे प्रकार होत असल्याचे उघड झाले आहे.

नवी दिल्ली : लैंगिक शोषणाविरुद्ध महिलांनी सुरु केलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर अन्य क्षेत्रांतही हे प्रकार होत असल्याचे उघड झाले आहे. एका महिला पत्रकाराने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर हिंदुस्थान टाईमचे ब्युरो चीफ प्रशांत झा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर टाइम्स आॅफ इंडियाच्या हैदराबाद आवृत्तीचे संपादक के.आर. श्रीनिवास यांना कंपनीने सात दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.के. आर. श्रीनिवास यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना प्रशासकीय रजेवर पाठविले आहे, असे टाइम्स आॅफ इंडियाने म्हटले आहे. श्रीनिवास यांच्यावर किमान पाच महिला पत्रकारांनी आरोप केलेहोते.प्रशांत झा यांचाही राजीनामा हिंदुस्थान टाइम्सने स्वीकारला असून, ती जबाबदारी अन्य संपादकाकडे सोपविली आहे. मात्र, परराष्ट्र राज्यमंत्री व माजी ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर यांनी स्वत:वरील आरोपांना अद्याप उत्तर दिलेलेनाही.केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारीच ‘मी टू’ मोहिमेचे स्वागत केले होते. मात्र, त्यांच्याच पक्षाचे भाजपचे नेते व परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाबद्दल त्यांनी स्वत: व भाजपनेही बोलण्याचे टाळले आहे.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले, तर मंत्रालयानेही अकबर यांच्यावरील आरोपांबद्दल बोलण्यास नकार दिला. अकबर यांनी ‘एशियन एज’चे संपादक असताना नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्याला हॉटेलात बोलावून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप महिला पत्रकाराने केलाआहे.‘हिंदुस्थान टाइम्स’चे ब्युरो चीफ यांच्यावरही महिलेच्या शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर माझ्यावर झालेले आरोप पाहता, मी ब्युरो चीफ व राजकीय संपादक या पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रशांत झा यांनी म्हटले आहे. एका वकील महिलेला त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह मेसेजेस पाठवले होते, असा आरोप आहे.भाजपा खासदाराचा वेगळा सूरमनेका गांधी यांनी मी टू मोहिमेचे स्वागत केले असले तरी त्यांच्याच पक्षाचे खासदार उदित राज यांनी ही मोहीम काही मंडळींना बदनाम करण्यासाठी चालवली असल्याचा वास येतो, असे म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीविरुद्ध १० वर्षांनी आरोप करून काय उपयोग? त्याची सत्यता कशी पडताळून पाहता येणार, असे सवाल करीत, मी टू चळवळीतून एक चुकीची प्रथा सुरू होत असल्याचे खा. उदित राज यांनी म्हटले आहे.एडिटर्स गिल्ड आॅफ इंडियाने महिला पत्रकारांचा त्यांच्याच पुरुष सहकाऱ्यांकडून लैंगिक छळ झाल्याच्या आरोपांबद्दल निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्या घटनांचा उल्लेख झालेला आहे त्यांची नि:पक्षपातीपणे चौकशी संबंधित प्रसारमाध्यमाच्या संघटनेने करावी. लैंगिक छळ/बलात्काराच्या आरोपांत जो कोणी दोषी आढळेल त्याला शिक्षा केली जावी, असे आवाहन या निवेदनात केले गेले आहे.सर्वोच्च न्यायालयात सार्वजनिक हित याचिका दाखल झाली असून, माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी बलात्कार केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या याचिकेत म्हटले आहे की, ज्या लोकांमध्ये सोली सोराबजी यांची नेहमी ऊठबस असते तेथे त्यांची ‘प्रतिमा’ ‘महिलांचे सिरियल सेक्शुअल हॅरासर’ अशी आहे, असे अनुषा सोनी यांनी टष्ट्वीट केले आहे.

टॅग्स :Metoo Campaignमीटू उपक्रम