शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : अकबर यांच्यावर आता अमेरिकेतील महिला पत्रकाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 16:12 IST

वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये या महिला पत्रकाराने तिच्यावर ओढवलेला गंभीर प्रसंग मांडला आहे. 

वॉशिंग्टन : डझनहून अधिक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर विरोधकांच्या दबावामुळे परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजपचे नेते एम. जे. अकबर यांच्यावर आता एका महिला पत्रकारानेही थेट अमेरिकेहून आरोप केले आहेत. वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये या महिला पत्रकाराने तिच्यावर ओढवलेला गंभीर प्रसंग मांडला आहे. 

भारतीय पत्रकार पल्लवी गोगोई 23 वर्षांपूर्वी एशियन एजमध्ये काम करत होती. यावेळी त्या 22 वर्षांच्या होत्या. सध्या त्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये काम करतात. एशियन एजमध्ये असताना पल्लवी जयपूरमध्ये एका स्टोरीवर काम करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी अकबर प्रसिद्ध संपादक होते. पल्लवीला पत्रकारितेची फारशी माहितीही नव्हती. पल्लवी या अकबर यांची पुस्तके वाचून प्रभावित झाल्या होत्या. 23 च्या वयामध्ये त्यांना संपादकीय पानाची जबाबदारी देण्यात आली. यासाठी त्यांना राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलावे लागायचे. जसवंत सिंह, अरुण शौरी आणि नलिनी सिंह यांच्यासारख्या नेत्यांना फोन करावा लागत होता. 

पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार ही घटना 1994 मधली आहे. अकबर यांच्या केबिनमध्ये पल्लवी संपादकीय पान दाखविण्यासाठी गेल्या होत्या. ते काहीतरी चांगली हेडलाईन देतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी माझे चुंबन घ्यायला लागले. मला धक्काच बसला. मी तडक ऑफिसमधून निघाले. लाज वाटत होती. माझी मैत्रिण तुषिता हिला आजही तेव्हाच माझा चेहला आठवतो. तिने विचारल्यावर तिला खरेखरे सांगितले. तेव्हा ती एकटीच होती, असेही पल्लवी यांनी लेखात म्हटले आहे. 

दुसरी घटना मुंबईत घडलीकाही महिन्यांनी मुंबईमध्ये एका मॅगझीनच्या लाँचिंगसाठी जायचे होते. तेथे अकबर यांनी ताज हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीतील सजावट पाहण्यासाठी बोलावले. तेथेही त्यांनी पुन्हा चुंबन घेतले. त्यांना धक्का देऊन मी सुटका करून घेतली. पळायला लागले तेव्हा गालावर त्यांनी मारले याचे व्रणही होते. संध्याकाळी एका मित्राने याबाबत विचारले मात्र त्याला घसरल्याने जखम झाल्याचे सांगितले. दिल्लीला आल्यानंतर अकबर यांनी पुढच्यावेळी विरोध केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. मात्र, मी ते वृत्तपत्र सोडले नाही. 

 

जयपूरमध्ये बलात्कारावेळी कपडेच फाडले....मुंबईच्या घटनेनंतर मला एका आडवळणाच्या गावात कामासाठी पाठविण्यात आले होते. यामुळे सकाऴी लवकर ऑफिसमध्ये जाऊन संपादकीय पानाचे काम संपवून पुन्हा त्या गावात रिपोर्टिंगसाठी जावे लागे. या गावात एका जोडप्याला काही लोकांनी फासावर लटकावले होते. मला देण्यात आलेले काम जयपूरमध्ये संपले होते. मात्र, अकबर यांनी सांगितले की जयपूरमध्येच ते या प्रकरणाच्या स्टोरीवर चर्चा करणार आहेत. यामुळे त्यांनी मला त्यांच्या हॉटेलच्या खोलीत बोलावले. दबावामुळे मी त्यांच्या खोलीत गेले. मात्र, त्यांनी माझे कपडे फाडले आणि बलात्कार केला. यावेळी मी त्यांना विरोधही केला. मात्र, पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पल्लवी यांनी या लेखामध्ये म्हटले आहे. 

 

टॅग्स :Metoo CampaignमीटूM J Akbarएम. जे. अकबरreporterवार्ताहरsexual harassmentलैंगिक छळRapeबलात्कार