शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खाते मान्सूनबरोबरच मलेरियाचाही अंदाज वर्तविणार- एम. राजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 07:00 IST

एचपीसीबाबत अमेरिका, ब्रिटन व जपाननंतर भारताचे स्थान

नवी दिल्ली : भारतातील हवामान खाते पुढील मान्सूनमध्ये मलेरियाच्या प्रकोपाचाही अंदाज वर्तविणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी शनिवारी ही माहिती दिली. भारतीय विज्ञान अकादमीने आयोजित केलेल्या हवामान व जलवायू पूर्वानुमानात झालेली प्रगती या विषयावरील संमेलनात बोलताना राजीवन म्हणाले की, उच्च दक्षता कम्प्युटिंग (एचपीसी) क्षमता सध्याच्या १० पेटा फ्लॉप्सपासून वाढवून ४० पेटाफ्लॉप्स करण्याची योजना आहे. यामुळे हवामान अंदाज वर्तविण्यात उल्लेखनीयरीत्या मदत मिळ‌णार आहे. सध्या एचपीसीबाबत अमेरिका, ब्रिटन व जपाननंतर भारताचे स्थान आहे.

मागील आठवड्यात पृथ्वी विज्ञान खात्याने एक अहवाल जारी करून म्हटले होते की, राष्ट्रीय मान्सून मिशन व एचपीसीवर योग्य तो खर्च करण्यात आला आहे. त्यापासून मि‌ळणारा लाभ ५० टक्के अधिक आहे. संमेलनानंतर राजीवन यांनी सांगितले की, व्हेक्टर जनित (डास आदीपासून फैलावणारे आजार) आजारांच्या प्रकोपाचा अंदाज वर्तविण्यासाठी आयएमडीने मलेरिया होण्याचा पावसाळ्याशी असलेला संबंध याबाबत अभ्यास केला आहे. आयएमडीने सर्वांत प्रथम नागपूरहून येणाऱ्या आकड्यांचा अभ्यास केला. तो इतर ठिकाणीही लागू होणार आहे. यामुळे मलेरियाचा अंदाज व्यापक प्रमाणावर लागू करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर डेंग्यू व इतर आजारांचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जाईल.

कुठे आढळतात सर्वाधिक रुग्ण?

आयएमडी पुढील वर्षाच्या मान्सूनमधील मलेरियाचा अंदाज वर्तविण्याची सेवा सुरू करणार आहे. विशेष म्हणजे जागतिक मलेरिया अहवाल-२०१९नुसार अफ्रिकेच्या उपसहारा भागातील १९ देश व भारतात जगभरातील ८५ टक्के मलेरियाचे रुग्ण आढळतात. राष्ट्रीय स्वास्थ्य पोर्टलनुसार, देशात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण पूर्व व मध्य भारतात, तसेच जंगल, पर्वत व आदिवासी भागांत आहेत. या राज्यांमध्ये ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व पूर्वोत्तर राज्ये (त्रिपुरा, मेघालय व मिझोराम) यांचा समावेश आहे. २००१ मध्ये देशात मलेरियाचे २०.८ लाख रुग्ण आढळले होते, तर २०१८ मध्ये या रुग्णांची संख्या चार लाखांच्या जवळ होती.

टॅग्स :TemperatureतापमानIndiaभारत