शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भारताशी पंगा घेतला, पाकिस्तान, चीनसारखी हालत होणार; बांगलादेशची टेक्सटाईल इंडस्ट्री भारताकडे वळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:22 IST

भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडले होते. तसेच कोरोना, अमेरिका-चीनच्या व्यापारी वादावर भारताने संधी साधत अॅपल सारख्या कंपन्या, सेमीकंडक्टर उद्योग आणत चीनलाही धडा शिकविला आहे.

बांगलादेशाची मोठी लोकसंख्या कपडा इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. बांगलादेशमध्ये निर्माण झालेले कपडे भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात. भारत सीमेवर कुंपण उभारत असताना बांगलादेशने त्यास खोडा घालण्याचा कुटील प्रयत्न केला आहे. मोदी सरकारने पाकिस्तान आणि चीनला जसा धडा शिकविला तशी वेळ पुन्हा येऊन ठेपली आहे. भारत गाजावाजा न करता एका झटक्यात बांगलादेशला मोठा धडा शिकवू शकणार आहे.

भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडले होते. तसेच कोरोना, अमेरिका-चीनच्या व्यापारी वादावर भारताने संधी साधत अॅपल सारख्या कंपन्या, सेमीकंडक्टर उद्योग आणत चीनलाही धडा शिकविला आहे. अशातच बांगलादेशनेही भारताशी पंगा घेतल्याने बांगलादेशची टेक्सटाईल इंडस्ट्रीचे महत्व कमी करण्याची तयारी सुरु केली आहे.

बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे जागतिक व्यापारी भारतात टेक्सटाईल इंडस्ट्रीकडे वळू लागले आहेत. भारतातील कपडा ते एक्पोर्ट करण्यासाठी येरझाऱ्या घालू लागले आहेत. शेख हसिना यांच्या कार्यकाळात तेथील टेक्सटाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढली, लोकांना रोजगार मिळाला. परंतू, गेल्या काही महिन्यांपासून तिथे सुरु असलेली हिंसा, हिंदू-मुस्लिम तणाव यामुळे इंडस्ट्रीसमोर मागणी पूर्ण करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. याचाच फायदा मोदी सरकारने उठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुढील महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामध्ये मोदी सरकार गारमेंट इंडस्ट्रीला मोठे पॅकेज देऊ शकते. यामध्ये अर्थसहाय्य, कच्च्या मालावरील कर कपात, स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देऊ शकतात. अशाने बांगलादेशाच्या ताटात थोडेबहुत जे काही पडत होते ते देखील भारताशी पंगा घेतल्याने निघून जाण्याची वेळ आली आहे. 

राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशच्या कपड्यांच्या निर्यातीत घट झाली आहे. अमेरिकेला होणारी वस्त्र निर्यात ०.४६% घसरून ६.७ अब्ज डॉलर्सवर आली. तर भारताची निर्यात ४.२५% वाढून ४.४ अब्ज डॉलर्स झाली आहे. हळूहळू भारत यातही मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशBudgetअर्थसंकल्प 2024IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी