शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

...म्हणून काँग्रेसचा पराभव झाला; वरिष्ठ नेत्यानं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 11:45 IST

जाहीरनाम्यातील तीन मुद्द्यांमुळे पराभव झाल्याची कबुली

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पदाचा राजीनामा दिला. निवडणुकीतील पराभवातून काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नाही. या पराभवाची कारणमिमांसा केली जात असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मांनी महत्त्वपूर्ण विधान केलं. राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आणि लष्कराला देण्यात आलेल्या विशेष अधिकारांमध्ये (अस्फ्पा) बदल करण्याचं आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यातून दिल्याचा फटका पक्षाला बसल्याचं शर्मा म्हणाले. काश्मीरमधील तैनात असलेल्या सैन्याच्या संख्येत कपात करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून देण्यात आलं होतं. हा संदर्भ देत शर्मांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर भाष्य केलं. 'पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपानं राष्ट्रवादाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. भाजपानं या मुद्द्याचं मोठ्या प्रमाणावर राजकीय भांडवल केलं. भाजपाच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. यासोबतच भाजपानं काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची तोडमोड केली आणि ते लोकांसमोर आणले,' असं शर्मा म्हणाले. 

निवडणूक निकालानंतर पक्ष संकटात सापडल्याची कबुली शर्मा यांनी एका मुलाखतीत दिली. 'काँग्रेस पक्ष संकटात आहे. कारण इतका मोठा पराभव होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला. मात्र हा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यामुळे अनिश्चिततेची परिस्थिती आहे. आता प्रामाणिकपणे पुढे जाण्याची आणि आत्परिक्षण करण्याची वेळ आली आहे. आम्ही नेमके कुठे चुकलो, याचं विश्लेषण व्हायला हवं. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष संपणार नाही. त्यामुळे पक्ष संघटनेत नेमक्या काय त्रुटी आहेत, याचा शोध आवश्यक आहे,' अशा शब्दांमध्ये शर्मा यांनी पराभवानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं. 
निवडणूक जाहीरनाम्यातील तीन मुद्दे काँग्रेससाठी अडचणीचे ठरल्याचं ते म्हणाले. 'राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं, अफ्स्पा कायद्यात बदल करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होतं. विरोधकांनी हे मुद्दे लावून धरले. ते चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर मांडले गेले. याशिवाय काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांची संख्या कमी करण्याचं आश्वासनदेखील पक्षासाठी अडचणीचं ठरलं,' अशी कबुली शर्मा यांनी दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधी