शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

“देश दोन हिंदूमध्ये विभागला गेलाय; एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही”: मीरा कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 09:08 IST

धर्म बदलला तरी, जात बदलत नाही, असे सांगत माझे वडील धर्मपरिवर्तनाला नकार द्यायचे, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील मंडळी आपल्या विधानांमुळे चर्चेत आली आहेत. अगदी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतपासून (Kangana Ranaut) ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यापर्यंत अनेकांची विधाने गाजताना दिसत आहेत. यातच आता लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार (Meira Kumar) यांची भर पडली आहे. देश दोन हिंदूमध्ये विभागला गेला आहे. एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे. 

माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांच्या “द लाइट ऑफ एशिया:द पोएम दैट डिफाइंड बुद्धा” या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आयोजित कार्यक्रमात मीरा कुमार बोलत होत्या. अनेकांनी माझ्या वडिलांना जातीय भेदभावामुळे हिंदू धर्म सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, माझे वडील जगजीवन राम यांनी हिंदू धर्म सोडण्यास सपशेल नकार दिला होता. तसेच या चुकीच्या सामाजिक व्यवस्थेविरोधात लढा देण्याचा निर्धार त्यांनी केला, अशी आठवण मीरा कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितली. 

२१ व्या शतकातही जाती व्यवस्था कायम

आजही २१ व्या शतकात जाती व्यवस्था कायम असल्याचे दिसून येते. आपला भारत देश दोन प्रकारच्या हिंदू समुदायांमध्ये विभागला गेला आहे. एक म्हणजे जो मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेऊ शकतो आणि दुसरा असा हिंदू समाज आहे, ज्याला अजूनही मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जातो, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे. तसेच धर्म बदला असा सल्ला देणाऱ्यांना वडील जगजीवन राम नेहमी विचारत असत की, धर्म बदलला म्हणून जात बदलणार आहे का, असेही मीरा कुमार यांनी सांगितले.

रस्ते चकचकीत झाले, मात्र विचार जुनेच आहेत

२१ व्या शतकात आपण आलो आहोत. अनेक गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळत आहेत. पायाभूत सुविधा सुधारताना दिसत आहेत. रस्ते चकचकीत झाले आहेत. मात्र, आपले विचार कधी चकचकीत होणार असा सवाल करत आजही पुजारी माझ्या गोत्राबाबत विचारणा करतात, तेव्हा त्यांना सांगते की, माझे संगोपन अशा वातावरणात झाले आहे, जिथे जात-पात मानली जात नाही. विविध धर्मांतील चांगल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, स्विकारल्या पाहिजेत आणि तोच आपला वारसा आहे, असेही मीरा कुमार यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

टॅग्स :Meera Kumarमीरा कुमार