शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमध्ये बैठकांचे सत्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:57 IST

शेतकरी ठाम; आज दिवसभर उपवास; विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र झाले आहे. सोमवारी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर सरकारविरोधात एका दिवसाचा उपवास करणार आहेत. आंदोलनाची धग वाढत असल्याने रविवारी दुपारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतली. बैठकीत दीर्घ चर्चा झाली. कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्याने सरकारची कोंडी झाली आहे.गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत राज्यमंत्री सोम प्रकाशदेखील उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी शेतकरी आंदोलनामुळे झाली आहे. कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी सरकारची बाजू मांडताना शेतकऱ्यांनी चर्चेची तयारी दाखवायला हवी, असे म्हटले आहे. गेल्या साठ वर्षांत विरोधकांनी केवळ राजकारण केले. आताही शेतकऱ्यांच्या वापर करून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी चर्चेसाठी दोन पावले पुढे सरकले तर सरकारदेखील पुढे येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.विरोधकांनी सरकारविरोधात सूर तीव्र केला आहे. आम आदमी पक्षानेदेखील शेतकऱ्यांच्या एकदिवसीय उपवासात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. आम आदमी पक्षाचे सर्व नेते, आमदार, कार्यकर्ते कृषी कायद्यांविरोधात उपवास करून शेतकऱ्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा कामगारमंत्री गोपाल राय यांनी केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील उपवास करणार आहेत. पंजाबमधून या कायद्यास सर्वाधिक विरोध होत आहे. पंजाबच्या तुरुंगमहासंचालकांनी देखील निवृत्तीची घोषणा केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीदेखील जंतर-मंतरवर शेतकरी आंदोलनात हजेरी लावली.आयआरसीटीसीची सोशल मीडियावर चर्चाआयआरसीटीसीच्या एका पुस्तिकेवरूनही सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. ४७ पानांच्या या पुस्तिकेत सरकार व शीख समुदायाच्या सकारात्मक संबंधांवर माहिती आहे. सिंह अडनाव असलेले व पंजांबी नागरिकांनाच ही पुस्तिका पाठवली जात आहे. त्यावर सरकारने स्पष्टीकरण देताना, ही पुस्तिका आधीच प्रसिद्ध झाल्याचे सांगितले.आंदोलनात काही राष्ट्रविरोधी व्यक्ती असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी व सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत म्हणाले, तसे असेल तर सरकारने त्यांना शोधावे. सरकारने गुप्तहेर यंत्रणेचा वापर करावा. आम्हाला मात्र असे राष्ट्रविरोधी कुणी आढळले नाही.सिंघू सीमेवर दर मिनिटाला येतात शेतकरीसिंघू सीमेवर दर मिनिटाला नव-नवे ट्रक आणि ट्रॉली येत आहेत. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या मार्गांनी शेकडो वाहने दिल्लीत येत असून त्यांना सीमेवर कोणीही अडवत नाही. पहाटे सहा वाजता २० शेतकऱ्यांना ताजपूर येथून घेऊन ट्रॉली आली. ट्रॉली साडेनऊ वाजता लुधियानाला परत गेली. रात्रभर ते पावसात प्रवास करत होते.शेतकऱ्यांपैकी अमनदीप सिंग (वय २५) म्हणाला की, काही शेतकरी शेतात काम करण्यासाठी त्यांच्या गावात गेले. मग आम्ही आमच्या गावचे प्रतिनिधित्व सामूहिकरित्या करण्याचे ठरविले. आम्ही जर परत गेलो तर आमची जागा इतर ट्रक्समधून आलेले लोक घेतील. ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे असे अनेक लोक आहेत.