शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमध्ये बैठकांचे सत्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:57 IST

शेतकरी ठाम; आज दिवसभर उपवास; विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र झाले आहे. सोमवारी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर सरकारविरोधात एका दिवसाचा उपवास करणार आहेत. आंदोलनाची धग वाढत असल्याने रविवारी दुपारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतली. बैठकीत दीर्घ चर्चा झाली. कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्याने सरकारची कोंडी झाली आहे.गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत राज्यमंत्री सोम प्रकाशदेखील उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी शेतकरी आंदोलनामुळे झाली आहे. कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी सरकारची बाजू मांडताना शेतकऱ्यांनी चर्चेची तयारी दाखवायला हवी, असे म्हटले आहे. गेल्या साठ वर्षांत विरोधकांनी केवळ राजकारण केले. आताही शेतकऱ्यांच्या वापर करून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी चर्चेसाठी दोन पावले पुढे सरकले तर सरकारदेखील पुढे येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.विरोधकांनी सरकारविरोधात सूर तीव्र केला आहे. आम आदमी पक्षानेदेखील शेतकऱ्यांच्या एकदिवसीय उपवासात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. आम आदमी पक्षाचे सर्व नेते, आमदार, कार्यकर्ते कृषी कायद्यांविरोधात उपवास करून शेतकऱ्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा कामगारमंत्री गोपाल राय यांनी केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील उपवास करणार आहेत. पंजाबमधून या कायद्यास सर्वाधिक विरोध होत आहे. पंजाबच्या तुरुंगमहासंचालकांनी देखील निवृत्तीची घोषणा केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीदेखील जंतर-मंतरवर शेतकरी आंदोलनात हजेरी लावली.आयआरसीटीसीची सोशल मीडियावर चर्चाआयआरसीटीसीच्या एका पुस्तिकेवरूनही सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. ४७ पानांच्या या पुस्तिकेत सरकार व शीख समुदायाच्या सकारात्मक संबंधांवर माहिती आहे. सिंह अडनाव असलेले व पंजांबी नागरिकांनाच ही पुस्तिका पाठवली जात आहे. त्यावर सरकारने स्पष्टीकरण देताना, ही पुस्तिका आधीच प्रसिद्ध झाल्याचे सांगितले.आंदोलनात काही राष्ट्रविरोधी व्यक्ती असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी व सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत म्हणाले, तसे असेल तर सरकारने त्यांना शोधावे. सरकारने गुप्तहेर यंत्रणेचा वापर करावा. आम्हाला मात्र असे राष्ट्रविरोधी कुणी आढळले नाही.सिंघू सीमेवर दर मिनिटाला येतात शेतकरीसिंघू सीमेवर दर मिनिटाला नव-नवे ट्रक आणि ट्रॉली येत आहेत. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या मार्गांनी शेकडो वाहने दिल्लीत येत असून त्यांना सीमेवर कोणीही अडवत नाही. पहाटे सहा वाजता २० शेतकऱ्यांना ताजपूर येथून घेऊन ट्रॉली आली. ट्रॉली साडेनऊ वाजता लुधियानाला परत गेली. रात्रभर ते पावसात प्रवास करत होते.शेतकऱ्यांपैकी अमनदीप सिंग (वय २५) म्हणाला की, काही शेतकरी शेतात काम करण्यासाठी त्यांच्या गावात गेले. मग आम्ही आमच्या गावचे प्रतिनिधित्व सामूहिकरित्या करण्याचे ठरविले. आम्ही जर परत गेलो तर आमची जागा इतर ट्रक्समधून आलेले लोक घेतील. ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे असे अनेक लोक आहेत.