शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात 11 नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 10:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे.  2019 पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा अखेरचा विस्तार असल्याचे म्हटले जात आहे.  दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारात निर्मला सितारमन, वीरेंद्र कुमार, शंकरभाई वेगाड, के. हरिबाबू, सत्यपाल सिंह यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली, दि. 2 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे.  2019 पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा अखेरचा विस्तार असल्याचे म्हटले जात आहे.  यामध्ये 11 नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर तीन विद्यमान मंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याचीही शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांना कॅबिनेटपदी बढती मिळणार असल्याचं समजतं आहे. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांचीही मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समजते आहे.  थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.

यांना मंत्रिमंडळात संधी  मिळण्याची शक्यता 1. अश्विनीकुमार चौबे : पहिल्यांदाच खासदार व बिहारचे आरोग्यमंत्री होते.2. वीरेंद्र कुमार, लोकसभा खासदार 3. अनंत कुमार हेगडे, कर्नाटक लोकसभा खासदार4. गुजरातचे खासदार शंकरभाऊ वेगड राज्यमंत्री होण्याची शक्यता, 5. राजकुमार सिंग (आर. के. सिंग), आरा बिहार खासदार, माजी गृहसचिव6. के. हरिबाबू- आंध्र, राज्यमंत्री7. शिवप्रताप शुक्ला, राज्यमंत्री होण्याची शक्यता, गोरखपूर, उत्तर प्रदेश8. हरदीप सिंग पुरी, माजी आयएफएस अधिकारी, अलिकडेच भाजपामध्ये केला प्रवेश9. सत्यपाल सिंग, माजी मुंबई पोलीस आयुक्त 10. के अल्फोंस- केरळ, माजी आयएएस अधिकारी 11. गजेंद्रसिंग शेखावत, जोधपूर, राजस्थान

नितीश कुमार म्हणाले, ''मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची माहितीच नाही''

दरम्यान, महिन्याभरापूर्वी लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची मैत्री तोडून भाजपाशी हातमिळवणी करत बिहारमध्ये सत्ता स्थापन करणारे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, त्यांना मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत काहीच माहीत नव्हते. मोदींच्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबतची बातमी त्यांना मीडियाद्वारे मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा पाटणामध्ये त्यांना पत्रकारांनी विचारेल की, तुमच्या पक्षाचाही केंद्रातील सत्तेत समावेश होत आहे? यावर नितीश कुमार यांनी उत्तर दिले की, याबाबत त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नितीश कुमार यांच्या पक्षातील दोन नेत्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. 

गडकरींच्या कामावर नरेंद्र मोदी खूश, खातं बदलण्याचा कोणताही विचार नाही - सूत्रांची माहिती

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामावर प्रचंड खूश असून त्यांचं मंत्रालय कायम ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. रविवारी (3 सप्टेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार असून यावेळी सुरेश प्रभूंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले रेल्वे मंत्रीपद नितीन गडकरी यांना देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नितीन गडकरी आपलं खातं समर्थपणे सांभाळत असून मोदींनी घेतलेल्या कामगिरीच्या आढाव्यात नितीन गडकरी पूर्ण गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल रविवारी सकाळी 10 वाजता होणार असून, त्याची सगळी तयारी झाली आहे.    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी रेल्वेसमोरील आव्हाने पूर्ण करण्यासाठी, तसंच खासकरुन रेल्वे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता नितीन गडकरींकडे हे खातं सोपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता नितीन गडकरींचं खातं न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रविवारी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल करण्यात येणार असून नितीन गडकरींचं नाव यादीत आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याआधी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यासाठी 'पॉझिटिव्ह' आणि 'निगेटिव्ह' अशा दोन प्रकारात कामाचं विभाजन करण्यात आलं होतं. मोदींच्या या परफॉर्मन्स चार्टमध्ये नितीन गडकरी पहिल्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना स्वत:लाही रेल्वे मंत्रालयाची घेण्यात कोणतंच स्वारस्य नव्हतं.  पक्षाने फक्त कामगिरीचा आढावा न घेता पक्षाने जाहीर केलेल्या योजना, उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशाप्रकारे काम करण्यात आलं याचीदेखील दखल घेतली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, सुरेश प्रभू यांना कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे. भाजपा सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या फेररचनेचा फटका दोन डझन मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपा