शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

India China Face Off: चीनचा दुटप्पीपणा आता खपवून घेतला जाणार नाही, जशास तसे उत्तर मिळेल; भारताचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 13:12 IST

India China Face Off: चीनला प्रत्युत्तर म्हणून पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी तिरंगा फडकावून नववर्षांचे स्वागत केले.

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवरून लडाखमधील गलवान खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. यातच, चिनी प्रसारमाध्यमांनी त्यांचे सैनिक गलवान खोऱ्यानजीक त्यांच्या बाजूकडे त्यांचा ध्वज फडकावित असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी तिरंगा फडकावून नववर्षांचे स्वागत केले. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला आता थेट इशारा दिला असून, चीनचा दुटप्पीपणा आता खपवून घेतला जाणार नाही, ड्रॅगनला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. 

गलवान खोऱ्यात चीनने राष्ट्रध्वज फडकवल्याबाबत परराष्ट्रमंत्री मीनाक्षी लेखी यांनी तीव्र आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली होती. भारतीय जवानांचे तेथील परिस्थितीवर नियंत्रण आहे. मात्र, यावर मी अधिक काही बोलणार नाही. चीनला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. चीनने तिथे काही कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे मीनाक्षी लेखी यांनी स्पष्ट केले आहे. 

राहुल गांधींवर साधला निशाणा

अलीकडेच राहुल गांधी यांनी ट्विट करत भारत आणि चीनच्या सीमा संघर्षावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. याबाबत मीनाक्षी लेखी यांना विचारले असता, अशा ट्विट्सवर मी प्रतिक्रिया देत नाही, असे सांगत लेखी यांनी राहुल यांच्या ट्विटवर काही बोलण्यास नकार दिला. मात्र, त्यांची (राहुल गांधी) यांची मातोश्री थायलँड येथे चिनी लोकांच्या भेटी-गाठी घेतात. यावर ते आता काय बोलणार आहेत, अशी टीका लेखी यांनी केली. 

दरम्यान, कडाक्याच्या हिवाळ्यातही पूर्व लडाखच्या प्रत्येक बाजूला सैन्याची मोठी उभारणी हे सूचित करते की, संघर्ष कमी होण्याची शक्यता नाही. भारताने असे म्हटले आहे की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) स्थिती चीनच्या बाजूने स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केल्यामुळे उद्भवली आहे. चीनने या भागात ६० हजार सैनिक तैनात केले असून, भारतानेही तेवढेच जवान तैनात केले असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव