शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

India China Face Off: चीनचा दुटप्पीपणा आता खपवून घेतला जाणार नाही, जशास तसे उत्तर मिळेल; भारताचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 13:12 IST

India China Face Off: चीनला प्रत्युत्तर म्हणून पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी तिरंगा फडकावून नववर्षांचे स्वागत केले.

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवरून लडाखमधील गलवान खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. यातच, चिनी प्रसारमाध्यमांनी त्यांचे सैनिक गलवान खोऱ्यानजीक त्यांच्या बाजूकडे त्यांचा ध्वज फडकावित असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी तिरंगा फडकावून नववर्षांचे स्वागत केले. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला आता थेट इशारा दिला असून, चीनचा दुटप्पीपणा आता खपवून घेतला जाणार नाही, ड्रॅगनला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. 

गलवान खोऱ्यात चीनने राष्ट्रध्वज फडकवल्याबाबत परराष्ट्रमंत्री मीनाक्षी लेखी यांनी तीव्र आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली होती. भारतीय जवानांचे तेथील परिस्थितीवर नियंत्रण आहे. मात्र, यावर मी अधिक काही बोलणार नाही. चीनला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. चीनने तिथे काही कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे मीनाक्षी लेखी यांनी स्पष्ट केले आहे. 

राहुल गांधींवर साधला निशाणा

अलीकडेच राहुल गांधी यांनी ट्विट करत भारत आणि चीनच्या सीमा संघर्षावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. याबाबत मीनाक्षी लेखी यांना विचारले असता, अशा ट्विट्सवर मी प्रतिक्रिया देत नाही, असे सांगत लेखी यांनी राहुल यांच्या ट्विटवर काही बोलण्यास नकार दिला. मात्र, त्यांची (राहुल गांधी) यांची मातोश्री थायलँड येथे चिनी लोकांच्या भेटी-गाठी घेतात. यावर ते आता काय बोलणार आहेत, अशी टीका लेखी यांनी केली. 

दरम्यान, कडाक्याच्या हिवाळ्यातही पूर्व लडाखच्या प्रत्येक बाजूला सैन्याची मोठी उभारणी हे सूचित करते की, संघर्ष कमी होण्याची शक्यता नाही. भारताने असे म्हटले आहे की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) स्थिती चीनच्या बाजूने स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केल्यामुळे उद्भवली आहे. चीनने या भागात ६० हजार सैनिक तैनात केले असून, भारतानेही तेवढेच जवान तैनात केले असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव