शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

करतारपूर कॉरिडोरचं निमित्त साधून काश्मीरवर बोलणं अयोग्य, सुषमा स्वराजांचं इम्रान यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:44 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यावेळी इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर विवादावर भाष्य केलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये फक्त काश्मीर मुद्द्यावरून भांडण सुरू आहे. दोन्ही सरकारांनी एकत्र येऊन चर्चा केल्यास हाही प्रश्न मार्गी लागेल. जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असे म्हणत खान यांनी भारताला मैत्रत्वाचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारतानंही इम्रान खान यांच्यावर पलटवार केला आहे.इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये खऱ्या वादाचं कारण काश्मीर असल्याचं आता स्पष्टच केलं आहे. या धार्मिक कार्यक्रमात इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानंही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं पहिल्यांदा स्वतःच्या धरतीवरून होणाऱ्या दहशतवादाला आळा घालावा आणि मग इतर विषयांवर बोलावे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर होणाऱ्या दहशतवादाला पहिल्यांदा रोखलं पाहिजे. यासाठी त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. त्यानंतर इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निषेध नोंदवला आहे. करतारपूर गुरुद्वारा कॉरिडोरच्या भूमिपूजनावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या कार्यक्रमादरम्यान त्या मुद्द्याचा उल्लेख करणं दुर्दैवी आहे. या कॉरिडोरच्या निमित्तानं खलिस्तान समर्थक बंडखोर गोपाल सिंग चावला आणि पाकिस्तान सेनेचे प्रमुख कमर जावेद बावजा यांच्या भेटीवर आक्षेप नोंदवला आहे. भारतानं या प्रकारावर निषेध नोंदवला आहे. परंतु पाकिस्ताननं याचं समर्थन केलं आहे. शांतीसाठी केलेल्या प्रयत्नांना कोणीही विरोध करू नये, असंही पाकिस्तान सेनेचे प्रवक्ते आसिफ गफूर म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज