शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

करतारपूर कॉरिडोरचं निमित्त साधून काश्मीरवर बोलणं अयोग्य, सुषमा स्वराजांचं इम्रान यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:44 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यावेळी इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर विवादावर भाष्य केलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये फक्त काश्मीर मुद्द्यावरून भांडण सुरू आहे. दोन्ही सरकारांनी एकत्र येऊन चर्चा केल्यास हाही प्रश्न मार्गी लागेल. जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असे म्हणत खान यांनी भारताला मैत्रत्वाचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारतानंही इम्रान खान यांच्यावर पलटवार केला आहे.इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये खऱ्या वादाचं कारण काश्मीर असल्याचं आता स्पष्टच केलं आहे. या धार्मिक कार्यक्रमात इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानंही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं पहिल्यांदा स्वतःच्या धरतीवरून होणाऱ्या दहशतवादाला आळा घालावा आणि मग इतर विषयांवर बोलावे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर होणाऱ्या दहशतवादाला पहिल्यांदा रोखलं पाहिजे. यासाठी त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. त्यानंतर इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निषेध नोंदवला आहे. करतारपूर गुरुद्वारा कॉरिडोरच्या भूमिपूजनावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या कार्यक्रमादरम्यान त्या मुद्द्याचा उल्लेख करणं दुर्दैवी आहे. या कॉरिडोरच्या निमित्तानं खलिस्तान समर्थक बंडखोर गोपाल सिंग चावला आणि पाकिस्तान सेनेचे प्रमुख कमर जावेद बावजा यांच्या भेटीवर आक्षेप नोंदवला आहे. भारतानं या प्रकारावर निषेध नोंदवला आहे. परंतु पाकिस्ताननं याचं समर्थन केलं आहे. शांतीसाठी केलेल्या प्रयत्नांना कोणीही विरोध करू नये, असंही पाकिस्तान सेनेचे प्रवक्ते आसिफ गफूर म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज