शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

करतारपूर कॉरिडोरचं निमित्त साधून काश्मीरवर बोलणं अयोग्य, सुषमा स्वराजांचं इम्रान यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:44 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यावेळी इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर विवादावर भाष्य केलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये फक्त काश्मीर मुद्द्यावरून भांडण सुरू आहे. दोन्ही सरकारांनी एकत्र येऊन चर्चा केल्यास हाही प्रश्न मार्गी लागेल. जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असे म्हणत खान यांनी भारताला मैत्रत्वाचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारतानंही इम्रान खान यांच्यावर पलटवार केला आहे.इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये खऱ्या वादाचं कारण काश्मीर असल्याचं आता स्पष्टच केलं आहे. या धार्मिक कार्यक्रमात इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानंही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं पहिल्यांदा स्वतःच्या धरतीवरून होणाऱ्या दहशतवादाला आळा घालावा आणि मग इतर विषयांवर बोलावे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर होणाऱ्या दहशतवादाला पहिल्यांदा रोखलं पाहिजे. यासाठी त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. त्यानंतर इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निषेध नोंदवला आहे. करतारपूर गुरुद्वारा कॉरिडोरच्या भूमिपूजनावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या कार्यक्रमादरम्यान त्या मुद्द्याचा उल्लेख करणं दुर्दैवी आहे. या कॉरिडोरच्या निमित्तानं खलिस्तान समर्थक बंडखोर गोपाल सिंग चावला आणि पाकिस्तान सेनेचे प्रमुख कमर जावेद बावजा यांच्या भेटीवर आक्षेप नोंदवला आहे. भारतानं या प्रकारावर निषेध नोंदवला आहे. परंतु पाकिस्ताननं याचं समर्थन केलं आहे. शांतीसाठी केलेल्या प्रयत्नांना कोणीही विरोध करू नये, असंही पाकिस्तान सेनेचे प्रवक्ते आसिफ गफूर म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज