शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नका, काश्मीरवरून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 19:18 IST

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानकडून देण्यात येत असलेल्या चिथावणीखोर आणि बेजबाबदार वक्तव्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शद्बांत निषेध नोंदवला आहे.

नवी दिल्ली -  काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानकडून देण्यात येत असलेल्या चिथावणीखोर आणि बेजबाबदार वक्तव्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शद्बांत निषेध नोंदवला आहे. तसेच भारताच्या अंतर्गत प्रश्नांबाबत न बोलण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तानचा हेतू या भारातील परिस्थिती चिघळवण्याचा आहे. त्यासाठी पाकिस्तान कपोलकल्पित आणि आधारहीन गोष्टींच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच भारतात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न  आणि जिहादचे आवाहन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे, असा आरोपही परराष्ट्र मंत्रालयाने केला.

यावेळी दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवरही परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार टीका केली. पाकिस्तान दहशतवादाचा वापर राष्ट्रीय धोरण म्हणून करत असतो हे सर्वांना ठावूक आहे. याबाबत आम्ही पाकिस्तानला वारंवार समजावले आहे. त्यांच्याकडून भारतात घुसखोरी करवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे त्यांच्या देशात ज्या दहशतवादी संघटना आहेत .त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी, ही आमची मागणी आहे.'' असे रविश कुमार यांनी सांगितले.  पाकिस्तानने भारतात ये-जा करण्यासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रविश कुमार  म्हणाले की, पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद करण्याबाबत कुठलीही अधिकृत सूचना दिलेली नाही,. तसेच कुलभूषण जाधव यांच्या हत्येप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, याबाबत आम्ही पाकिस्तानच्या संपर्कात आहोत. तसेच आम्ही कुलभूषण जाधव यांच्याशी संवाद साधण्यासाठी विनाअट कन्सुलर अॅक्सेस देण्याची मागणी आम्ही केली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान